शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब, वेळ आली की फोडणार-राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:17 IST

माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देविरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब, वेळ आली की फोडणार-राजेश क्षीरसागरभाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद

कोल्हापूर : मी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा कट्टर कार्यकर्ता आहे. भ्रष्टाचार आणि गद्दारी माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या आणि जनतेच्या विश्वासावर मी निवडून आलो. आता निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे, माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न होत आहे.

माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद जुंपला आहे. यावर आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. युतीचा निर्णय झाला त्या दिवसापासून मी सगळे मतभेद विसरून लोकसभा उमेदवारासाठी प्रचारसभा, मेळावे, कोपरासभा घेऊन प्रचंड काम केले. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत विजय देवणे, प्रा. संजय मंडलिक यांना उत्तरमधून मताधिक्य मिळवून दिले आहे. यंदाही त्यांना २५ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे.युती धर्मासाठी मी निकराने प्रचार केला आहे. आता राजकारण बदलत असलं, तरी कोणी कोणत्या थराला जायचं याचा विचार करून त्याने आपली नितिमत्ता ठरवावी. विरोधकांकडून जाणीवपूर्वक माझी बदनामी करून मला जनतेतून पाडण्याचा, तिकीट कापण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टींना मी भीक घालत नाही. या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवर मी वेळ आली की पक्षप्रमुखांच्या संमतीने पुराव्यासह उत्तर देईन आणि त्यांचे पितळ उघडे पाडेन.

युतीची सत्ता आली की मंत्रिपद ...क्षीरसागर म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर मी दोनवेळा निवडून आलो. मी निवडून येतो त्यावेळीच जनतेसाठी काम सुरू करतो. त्यांच्यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे; त्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही. आता युती झाली आहे, त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेलाही युतीची सत्ता येईल आणि त्यावेळी मी मंत्रिपदी असेन. 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर