शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब, वेळ आली की फोडणार-राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:17 IST

माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देविरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब, वेळ आली की फोडणार-राजेश क्षीरसागरभाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद

कोल्हापूर : मी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा कट्टर कार्यकर्ता आहे. भ्रष्टाचार आणि गद्दारी माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या आणि जनतेच्या विश्वासावर मी निवडून आलो. आता निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे, माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न होत आहे.

माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद जुंपला आहे. यावर आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. युतीचा निर्णय झाला त्या दिवसापासून मी सगळे मतभेद विसरून लोकसभा उमेदवारासाठी प्रचारसभा, मेळावे, कोपरासभा घेऊन प्रचंड काम केले. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत विजय देवणे, प्रा. संजय मंडलिक यांना उत्तरमधून मताधिक्य मिळवून दिले आहे. यंदाही त्यांना २५ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे.युती धर्मासाठी मी निकराने प्रचार केला आहे. आता राजकारण बदलत असलं, तरी कोणी कोणत्या थराला जायचं याचा विचार करून त्याने आपली नितिमत्ता ठरवावी. विरोधकांकडून जाणीवपूर्वक माझी बदनामी करून मला जनतेतून पाडण्याचा, तिकीट कापण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टींना मी भीक घालत नाही. या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवर मी वेळ आली की पक्षप्रमुखांच्या संमतीने पुराव्यासह उत्तर देईन आणि त्यांचे पितळ उघडे पाडेन.

युतीची सत्ता आली की मंत्रिपद ...क्षीरसागर म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर मी दोनवेळा निवडून आलो. मी निवडून येतो त्यावेळीच जनतेसाठी काम सुरू करतो. त्यांच्यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे; त्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही. आता युती झाली आहे, त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेलाही युतीची सत्ता येईल आणि त्यावेळी मी मंत्रिपदी असेन. 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर