शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

ज्यांनी केला घात, त्यांना नाही साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:16 IST

कोल्हापूर : ‘ज्यांनी केला घात, त्यांना पुन्हा नाही साथ,’ अशी घोषणा करून कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे ...

कोल्हापूर : ‘ज्यांनी केला घात, त्यांना पुन्हा नाही साथ,’ अशी घोषणा करून कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठीची दिशा स्पष्ट केली. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘नेत्यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांच्या घरी जाईन,’ असे वक्तव्य केले होते, तो मनोमिलनाचा प्रस्तावही त्यांनी धुडकावला.कोल्हापूर जिल्हा युवक कॉँग्रेसच्या परिवर्तन अभियानाची सांगता सभा जवाहरनगर चौकात झाली; यावेळी ते बोलत होेते. प्रमुख उपस्थिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज विलासराव देशमुख, प्रतिमा सतेज पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लाणी, युवक कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, उपाध्यक्ष बयाजी शेळके, कल्याणी माणगावे, वैशाली पसारे, आदींची होती.लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काही मंडळी घरी येऊन भेट घेतो म्हणून लागली आहेत; पण आता निर्णय पक्का झाला असून त्यात बदल होणार नाही. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करणार नाही, असा पुनरुच्चार पाटील यांनी केला.आमदार पाटील म्हणाले, जनता भाजप सरकारला कंटाळली असून परिवर्तन अटळ आहे. अहमदनगर व लातूरच्या बरोबरीने विधानसभेत कोल्हापूरचे आमदार असतील. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे आम्ही एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातून कॉँग्रेसचे सहा आमदार निवडून येण्यास अडचण नाही.धीरज देशमुख यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या सरकारकडून गेल्या साडेचार वर्षांत लोकांना मिळालेल्या दोन गोष्टी म्हणजे खोटी आश्वासने व खरा त्रास या आहेत. हे सरकार ‘आॅनलाईन’वर असून जनता व शेतकरी ‘सलाईन’वर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.विधान परिषदेच्या माध्यमातून सतेज पाटील हे सध्या रणजी खेळत असून, ते येणाºया विधानसभेच्या वनडेसाठी तयार आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.सत्यजित तांबे यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यासाठी अनेक ‘आयटी’चे प्रकल्प आणले; परंतु गेल्या साडेचार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही ‘आयटी’ प्रकल्प आणला नसल्याची टीका केली.धीरज यांच्या भाषणाने विलासरावांची आठवणआक्रमक शैलीत मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणाºया धीरज देशमुख यांना कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद मिळाली. त्यांच्या भाषणशैलीवर त्यांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाच प्रभाव दिसून आला. या निमित्ताने व्यासपीठावरील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही काही काळ विलासरावांची आठवण झाली. आमदार सतेज पाटीलही यांनीही धीरज यांच्या भाषणाने प्रभावित होऊन, ‘मला काही काळ देशमुखांनाच ऐकल्यासारखे वाटल्याचे आवर्जून सांगितले.पालकमंत्र्यांनी दिले फक्त दोन कोटीपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेसाठी फक्त दोन कोटींचा निधी दिला आहे. यापेक्षा जादा निधी एका प्रभागात खर्च झाला आहे. अशा शब्दांत उपमहापौर भूपाल शेटे यांनी टोला लगावला. शहरातील मंडळांना मागेल तितके पैसे देणाºया पालकमंत्र्यांनी ते पैसे विकासकामांसाठी दिले असते तर शहर उजळून निघाले असते, असेही ते म्हणाले.