शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची कसून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:56 IST

पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १0 सदस्यांच्या चार पथकांनी कसून पडताळणी केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून रत्नागिरीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पडताळणी केली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची कसून पडताळणीचार पथकांकडून दिवसभर कार्यरत, आता लक्ष अंतिम निकालाकडे

कोल्हापूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १0 सदस्यांच्या चार पथकांनी कसून पडताळणी केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून रत्नागिरीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पडताळणी केली.या योजनेतून सर्वाधिक गुण मिळविलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींची क्षेत्रीय पडताळणी गुरुवारी दिवसभर राज्यात सुरू होती. सकाळी ११ नंतर जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहामध्ये या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली. सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मनीषा देसाई आणि अन्य अधिकाऱ्यांचे स्वागत केले.दिवसभर दोन सत्रांमध्ये जिल्हा परिषदेने जी प्रश्नावली भरून दिली, याबाबतची अधिकची माहिती घेऊन या विषयीची खातरजमा या समितीकडून केली जात होती. त्यांनी काही मुद्द्यांबाबत विचारणा करत स्पष्टीकरणही घेतले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी याबाबत नियोजन करत सर्व विभागांचा समन्वय राखला.दुपारनंतर पुन्हा अमन मित्तल या ठिकाणी उपस्थित होते. भुदरगड तालुक्यातील खानापूर आणि म्हसवे ग्रामपंचायत आणि गडहिंग्लज पंचायत समिती तसेच पन्हाळा तालुक्यातील कुशिरे ग्रामपंचायतीची पडताळणी अन्य तीन स्वतंत्र समित्यांकडून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यात एकूण १0 अधिकारी या पडताळणीसाठी आले होते.सकाळपासूनच वेगवेगळ्या खातेप्रमुखांनी आपल्या विभागांबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले होते. आता हे मिळालेले गुण आॅनलाईन भरण्यात येणार असून, उद्या ते अंतिम करण्यात येतील आणि नंतर दिल्लीला आॅनलाईन भरण्यात येतील.

राज्यभरातून १२ ग्रामपंचायती, ६ पंचायत समित्या आणि १ जिल्हा परिषदेचे नाव पुरस्कारासाठी दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. त्यातून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून पहिल्या ठरलेल्या जिल्हा परिषदेला २५ लाखांचा पुरस्कार निश्चित मानला जातो. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर