शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची कसून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:56 IST

पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १0 सदस्यांच्या चार पथकांनी कसून पडताळणी केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून रत्नागिरीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पडताळणी केली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची कसून पडताळणीचार पथकांकडून दिवसभर कार्यरत, आता लक्ष अंतिम निकालाकडे

कोल्हापूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १0 सदस्यांच्या चार पथकांनी कसून पडताळणी केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून रत्नागिरीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पडताळणी केली.या योजनेतून सर्वाधिक गुण मिळविलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींची क्षेत्रीय पडताळणी गुरुवारी दिवसभर राज्यात सुरू होती. सकाळी ११ नंतर जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहामध्ये या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली. सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मनीषा देसाई आणि अन्य अधिकाऱ्यांचे स्वागत केले.दिवसभर दोन सत्रांमध्ये जिल्हा परिषदेने जी प्रश्नावली भरून दिली, याबाबतची अधिकची माहिती घेऊन या विषयीची खातरजमा या समितीकडून केली जात होती. त्यांनी काही मुद्द्यांबाबत विचारणा करत स्पष्टीकरणही घेतले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी याबाबत नियोजन करत सर्व विभागांचा समन्वय राखला.दुपारनंतर पुन्हा अमन मित्तल या ठिकाणी उपस्थित होते. भुदरगड तालुक्यातील खानापूर आणि म्हसवे ग्रामपंचायत आणि गडहिंग्लज पंचायत समिती तसेच पन्हाळा तालुक्यातील कुशिरे ग्रामपंचायतीची पडताळणी अन्य तीन स्वतंत्र समित्यांकडून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यात एकूण १0 अधिकारी या पडताळणीसाठी आले होते.सकाळपासूनच वेगवेगळ्या खातेप्रमुखांनी आपल्या विभागांबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले होते. आता हे मिळालेले गुण आॅनलाईन भरण्यात येणार असून, उद्या ते अंतिम करण्यात येतील आणि नंतर दिल्लीला आॅनलाईन भरण्यात येतील.

राज्यभरातून १२ ग्रामपंचायती, ६ पंचायत समित्या आणि १ जिल्हा परिषदेचे नाव पुरस्कारासाठी दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. त्यातून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून पहिल्या ठरलेल्या जिल्हा परिषदेला २५ लाखांचा पुरस्कार निश्चित मानला जातो. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर