शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:37 IST

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देपन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पन्हाळा : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

किसान आत्मनिर्भर यात्रा काल पन्हाळा येथे मुक्कामी होती. आज सकाळी सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर पन्हाळाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली.

पन्हाळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत. महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचा सांगितलं.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या जनतेच्या शेतामध्ये पिकाच्या देठाला जरी हात लावल तर याद राखा. अश्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन रयतेचे राज्य उभे केले होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील जुनी व्यवस्था मोडित काढुन शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दलालांच्या जोखडातून मुक्त करणारे शेतकरी हिताचे कायदेच मोदी सरकारने आणले आहेत, असे पडळकर म्हणाले.

गेली ७० वर्षे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे व शेती हिताचे कायदे आणले नाहीत, त्यामुळे किमान पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता नवे कायदे जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे मोदी सरकारने आणले आहेत. या कायद्यांमुळे शरद जोशींसारख्या नेत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. शेतकरी हिताचे असूनही या कायद्यांना विरोध होत आहे हे दुर्दैव आहे अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. पडळकर यांनी खंत व्यक्त केली.  म्हणाले, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे. शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

यावेळी पन्हाळाच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचीन शिपुगडे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर