शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:37 IST

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देपन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पन्हाळा : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

किसान आत्मनिर्भर यात्रा काल पन्हाळा येथे मुक्कामी होती. आज सकाळी सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर पन्हाळाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली.

पन्हाळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत. महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचा सांगितलं.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या जनतेच्या शेतामध्ये पिकाच्या देठाला जरी हात लावल तर याद राखा. अश्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन रयतेचे राज्य उभे केले होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील जुनी व्यवस्था मोडित काढुन शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दलालांच्या जोखडातून मुक्त करणारे शेतकरी हिताचे कायदेच मोदी सरकारने आणले आहेत, असे पडळकर म्हणाले.

गेली ७० वर्षे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे व शेती हिताचे कायदे आणले नाहीत, त्यामुळे किमान पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता नवे कायदे जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे मोदी सरकारने आणले आहेत. या कायद्यांमुळे शरद जोशींसारख्या नेत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. शेतकरी हिताचे असूनही या कायद्यांना विरोध होत आहे हे दुर्दैव आहे अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. पडळकर यांनी खंत व्यक्त केली.  म्हणाले, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे. शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

यावेळी पन्हाळाच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचीन शिपुगडे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर