शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:37 IST

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देपन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पन्हाळा : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

किसान आत्मनिर्भर यात्रा काल पन्हाळा येथे मुक्कामी होती. आज सकाळी सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर पन्हाळाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली.

पन्हाळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत. महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचा सांगितलं.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या जनतेच्या शेतामध्ये पिकाच्या देठाला जरी हात लावल तर याद राखा. अश्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन रयतेचे राज्य उभे केले होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील जुनी व्यवस्था मोडित काढुन शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दलालांच्या जोखडातून मुक्त करणारे शेतकरी हिताचे कायदेच मोदी सरकारने आणले आहेत, असे पडळकर म्हणाले.

गेली ७० वर्षे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे व शेती हिताचे कायदे आणले नाहीत, त्यामुळे किमान पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता नवे कायदे जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे मोदी सरकारने आणले आहेत. या कायद्यांमुळे शरद जोशींसारख्या नेत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. शेतकरी हिताचे असूनही या कायद्यांना विरोध होत आहे हे दुर्दैव आहे अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. पडळकर यांनी खंत व्यक्त केली.  म्हणाले, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे. शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

यावेळी पन्हाळाच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचीन शिपुगडे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर