शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:37 IST

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देपन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पन्हाळा : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

किसान आत्मनिर्भर यात्रा काल पन्हाळा येथे मुक्कामी होती. आज सकाळी सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर पन्हाळाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली.

पन्हाळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत. महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचा सांगितलं.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या जनतेच्या शेतामध्ये पिकाच्या देठाला जरी हात लावल तर याद राखा. अश्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन रयतेचे राज्य उभे केले होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील जुनी व्यवस्था मोडित काढुन शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दलालांच्या जोखडातून मुक्त करणारे शेतकरी हिताचे कायदेच मोदी सरकारने आणले आहेत, असे पडळकर म्हणाले.

गेली ७० वर्षे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे व शेती हिताचे कायदे आणले नाहीत, त्यामुळे किमान पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता नवे कायदे जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे मोदी सरकारने आणले आहेत. या कायद्यांमुळे शरद जोशींसारख्या नेत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. शेतकरी हिताचे असूनही या कायद्यांना विरोध होत आहे हे दुर्दैव आहे अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. पडळकर यांनी खंत व्यक्त केली.  म्हणाले, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे. शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

यावेळी पन्हाळाच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचीन शिपुगडे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर