शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:50 IST

''पंतप्रधानांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे विधान हास्यास्पद'' 

कोल्हापूर : देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत आहेत. यातून जनतेची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याने जनता सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे. यामुळे देशात व राज्यात सत्तांतर होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.चव्हाण म्हणाले, पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांची वागणूक भयानक होती. राज्यात भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याचे यातून दिसून आले. जनता याला कंटाळली असून, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानाचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. मोदी हे निवडणूक काळात सतत प्रचारात व्यस्त होते. यामुळे त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले आहे. त्यांना उपचाराची गरज असून त्यांचे विधान हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दुष्काळासाठी काँग्रेसची जिल्हानिहाय बैठकराज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून सरकारने निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करत चव्हाण यांनी काँग्रेसने समित्या स्थापन केल्या असून लवकरच जिल्हानिहाय दुष्काळाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.

पी. एन. यांना मंत्रिपद मिळायला हवे होतेपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार पी. एन. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळायला हवे होते. मात्र, ते न मिळूनही ते कधी नाराज झाले नाहीत. लोकसभेला त्यांनी उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. या लोकसभा निवडणुकीत स्वत: उमेदवार असल्यासारखे त्यांनी गाव ना गाव पिंजून काढत काँग्रेसचा प्रचार केला. अशा निष्ठावंत नेत्याच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दांत चव्हाण यांनी पी. एन. यांना आदरांजली वाहिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी