शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:50 IST

''पंतप्रधानांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे विधान हास्यास्पद'' 

कोल्हापूर : देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत आहेत. यातून जनतेची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याने जनता सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे. यामुळे देशात व राज्यात सत्तांतर होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.चव्हाण म्हणाले, पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांची वागणूक भयानक होती. राज्यात भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याचे यातून दिसून आले. जनता याला कंटाळली असून, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानाचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. मोदी हे निवडणूक काळात सतत प्रचारात व्यस्त होते. यामुळे त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले आहे. त्यांना उपचाराची गरज असून त्यांचे विधान हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दुष्काळासाठी काँग्रेसची जिल्हानिहाय बैठकराज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून सरकारने निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करत चव्हाण यांनी काँग्रेसने समित्या स्थापन केल्या असून लवकरच जिल्हानिहाय दुष्काळाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.

पी. एन. यांना मंत्रिपद मिळायला हवे होतेपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार पी. एन. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळायला हवे होते. मात्र, ते न मिळूनही ते कधी नाराज झाले नाहीत. लोकसभेला त्यांनी उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. या लोकसभा निवडणुकीत स्वत: उमेदवार असल्यासारखे त्यांनी गाव ना गाव पिंजून काढत काँग्रेसचा प्रचार केला. अशा निष्ठावंत नेत्याच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दांत चव्हाण यांनी पी. एन. यांना आदरांजली वाहिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी