शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मीटर, शंभर टक्के वसुलीशिवाय नवी पाणी योजना नाही : शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:16 IST

पाणी मीटर बसविल्याशिवाय आणि १00 टक्के पाणीपट्टी वसुली असल्याशिवाय कोणत्याही गावासाठी नवी पाणी योजना न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात

ठळक मुद्देविहिरी, कुपनलिका खुदाईसाठीही परवानगी लागणार; जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीमधील माहिती

कोल्हापूर : पाणी मीटर बसविल्याशिवाय आणि १00 टक्के पाणीपट्टी वसुली असल्याशिवाय कोणत्याही गावासाठी नवी पाणी योजना न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक होत्या.

एकीकडे पाठपुरावा करून गावागावांसाठी नव्या पाणी योजना मंजूर करून घेतल्या जातात; मात्र पाण्याची बचत करण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. पाणीपट्टीही भरली जात नाही. याला चाप लावण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

शासनाने ९ मार्च २0१८ रोजी आदेश काढून ज्या पाणी योजनांचे काम सुरूच झालेले नाही, अशा योजना निधीसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांच्या पाणी योजनांच्या ठेकेदारांचे ८८ कोटी रुपये थकीत असल्याने या योजना पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. ज्या योजनांचे काम मुदतीत सुरू झालेले नाही, अशा योजनांचा निधी वर्ग करून ही बिले अदा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला; त्यामुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या योजना तरी पूर्ण होतील, असे सांगण्यात आले.

यापुढच्या काळात विहिरी, कूपनलिका खुदाई यांसाठीही परवानगी लागणार असून एकूणच पाणी उपलब्धता आणि उपसा याबाबत नवे धोरण ठरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पंचगंगा प्रदूषणप्रकरणी १४ गावांमध्ये उपाययोजना केल्या जातात; मात्र कुठल्याच गावातील कामे पूर्ण नाहीत, अशी वस्तुस्थिती यावेळी मांडण्यात आली. जेथे उपाययोजनांची कामे करण्यासाठी अडचण नाही, अशा गावांची कामे पूर्ण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी आपल्या कळे या गावी ४0 लिटरऐवजी ७0 लिटर माणशी पाणी देणारी योजना करावी, अशी मागणी केली. तसेच पाणी योजना करताना आधी उद्भव, पाणी साठवण्याची क्षमता या सर्व बाबींचा अभ्यास करून मगच योजना राबवली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीला सभापती अंबरीश घाटगे, वंदना मगदूम, सदस्य बंडा माने, हेमंत कोलेकर, शिवाजीराव मोरे, राणी खमलेट्टी, स्वरूपाराणी जाधव, विद्या पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, अभियंता मारुती बसर्गेकर, उपस्थित होते.ठेकेदारांच्या शिष्टमंडळाची मागणीपाणी योजनांची बिले थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविण्याची बहुतांश जिल्हा परिषदेमध्ये पद्धत आहे; त्यामुळे पाणी व स्वच्छता विभागाकडे बिले पाठविण्यापेक्षा ती थेट मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवली जावीत, अशी मागणी ठेकेदारांच्या संघटनेने अध्यक्ष महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना