शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर.., आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

By पोपट केशव पवार | Updated: June 24, 2024 14:16 IST

'बिद्री कारखान्यावरील कारवाई चुकीची'

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताच वाद असणार नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जाऊ. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जागांवरून कोणतीही अडचण येणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय इंडिया आघाडी एकत्रित घेईल. कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून कोणतीही अडचण येणार नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन आम्ही पुढे जाऊ. एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षातून उभा राहील.बिद्रीवरील कारवाई चुकीचीशाहू छत्रपती भुदरगडच्या दौऱ्यावर असताना के. पी. पाटील यांनी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले. त्याचे पडसाद उमटले की नाही हे मला माहीत नाही. मात्र, बिद्रीवरील झालेली कारवाई चुकीची आहे. बिद्री कारखाना ६५ हजार शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शेतकऱ्यांची संस्था अडचणीत आणून कोणी यात राजकारण करत असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.प्रत्येक शक्तिपीठाला पाच हजार कोटी द्याशक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही. सरकारला शक्तिपीठांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी प्रत्येक शक्तिपीठाला पाच पाच हजार कोटी रुपये देऊन त्या भोवतालचा परिसर विकसित करावा. तिथे येणाऱ्या भाविकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील