शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शिक्षणसेवकांसाठी आनंदवार्ता!, मानधनात झाली भरघोस वाढ, भरती नसल्याने कोल्हापुरात लाभार्थी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:42 IST

सरकारने २२ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला होता

पोपट पवार

कोल्हापूर : राज्यातील शिक्षणसेवकांना पहिली तीन वर्षे अगदी अल्प मानधन मिळत असल्याने स्वत:च्या खर्चासाठीही त्यांना दुसऱ्यांकडून हातउसने पैसे घ्यावे लागत होते. आता मात्र सरकारने मानधनात अपेक्षित वाढ केल्याने स्वत:सह कुटुंबालाही हातभार लावता येणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणसेवकांकडून व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आमचा चरितार्थही चालेल आणि आमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या हालअपेष्टाही थांबतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने २००० साली शिक्षणसेवकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. तो कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना नियमित सेवेत घेऊन त्यांना पूर्ण वेतन दिले जाते.२०११ मध्ये केली होती वाढनियुक्त केलेल्या शिक्षणसेवकांना पहिली तीन वर्षे अगदी तुटपुंजे मानधन होते. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविणेही त्यांच्यासाठी मुश्कील होते. शिक्षणसेवकांच्या मागणीनंतर २०११ मध्ये सरकारने काहीशी वाढ केली होती. मात्र, तेही मानधन समाधानकारक नव्हते. सध्या प्राथमिक शिक्षणसेवकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षणसेवकांना आठ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. शिक्षणसेवकांच्या मागणीनंतर आता या मानधनात वाढ केली आहे.नव्या शिक्षणसेवकांना मिळणार लाभगेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षणसेवकांची भरती झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. लवकरच राज्यात ६७ हजार शिक्षणसेवकांची भरती केली जाणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या मानधनवाढीचा लाभ नव्या शिक्षणसेवकांना अधिक होणार आहे.आता किती मानधनवाढप्राथमिक शिक्षणसेवकांना सहा हजार रुपयांवरून १६ हजार रुपये मानधनवाढ करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणसेवकाचे मानधन आठ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात आले आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांचे मानधन नऊ हजार रुपयांवरून थेट २० हजार रुपये करण्यात आले आहे.डिसेंबरमध्ये घेतला होता निर्णयसरकारने २२ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला होता. त्याचा अध्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी काढण्यात आला.जिल्ह्यात किती जणांना होणार लाभप्राथमिक- ७माध्यमिक- ५५उच्च माध्यमिक- ०(गत महिन्यांत १०० हून अधिक जण तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून कायम सेवेत गेले आहेत.)

सुरुवातीला तीन वर्षे अल्प मानधन असल्याने घरखर्चही भागत नव्हता. त्या तुलनेत सरकारने आता केलेली मानधनवाढ समाधानकारक आहे. - संतोष झिंत्रे - शिक्षणसेवक, केएमसी कॉलेज, कोल्हापूर 

मानधनवाढीचा निर्णय चांगला आहे. यामुळे शिक्षणसेवकांना निदान स्वत:चा खर्च तरी स्वत:च्या पैशातून करता येईल. महागाईच्या काळात ही वाढ कमी असली तरी पूर्वीच्या तुलनेत ती खूपच अधिक आहे. - अनिल माळगे, शिक्षणसेवक, भोगावती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक