शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
3
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
4
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
5
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
6
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
7
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
8
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
9
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
10
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
11
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
12
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
13
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
14
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
15
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
16
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
17
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
18
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
19
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
20
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Kolhapur: प्रस्तावांची ‘हद्द’; पण शहराची इंचानेही नाही ‘वाढ’, राजकीय विषय बनल्याने कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:21 IST

हद्दवाढीचे अनेक प्रस्ताव शासन दरबार पडून असताना आता पुन्हा प्रस्ताव कशासाठी?

कोल्हापूर : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शनिवारी शहर हद्दवाढ समन्वय कृती समितीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत हद्दवाढ होण्यापूर्वीच शहरात येणाऱ्या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी काय करणार? कर आकारणी कशी होणार? किती गावांचा विकास करण्यास सक्षम आहे, याच्या माहितीसह नवीन हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. हद्दवाढीचे अनेक प्रस्ताव शासन दरबार पडून असताना आता पुन्हा प्रस्ताव कशासाठी? असा सवाल उपस्थित झाला आहे.हद्दवाढ निर्णयाच्या टप्यात आल्यानंतर पुन्हा मंत्री मिसाळ मागे गेल्याचा आरोप कृती समितीमधील पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. यापूर्वी अनेकवेळा हद्दवाढीसंबंधीचे प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत. हद्दवाढीसाठी दबाव वाढल्यानंतर हद्दवाढ न करता त्या त्या वेळच्या सरकारने वेळ मारून नेण्याची भूमिका घेतली. आत्ताही हद्दवाढीच्याबाबतीत असेच होत असल्याचे पुढे येत आहे.शहराची हद्दवाढ सन १९४६ पासून झालेली नाही. यासाठी गेल्या चार दशकाहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. पण महापालिका शहराचा दखल घेण्यासारखा विकास करू शकलेली नाही तर आम्हाला का घेता, अशी भूमिका घेत परिसरातील गावांनी हद्दवाढीला विरोध केला. विरोधाचे नेतृत्व त्यांचे आमदार करीत आहेत. यामुळे सन २०१७ मध्ये हद्दवाढीच्या निर्णयावर सही होत असतानाच हद्दवाढ विरोधी आमदार आक्रमक झाल्याने प्राधिकरणाची स्थापना झाली.दरम्यान, आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. पावसाळा झाल्यानंतर निवडणूक होईल. त्याआधीच म्हणजे आताच हद्दवाढ व्हावी, यासाठी कृती समितीचा आग्रह वाढला आहे. शहराचे आमदार राजेश क्षीरसागर आणि सहपालकमंत्री मिसाळ हद्दवाढीसाठी सरकार सकारात्मक आहे, असे सांगत आहेत. पण यापूर्वीही असे सांगूनही हद्दवाढीचा निर्णय ऐनवेळी लटकला आहे.यावेळी हद्दवाढीसाठी पोषक स्थिती तयार झाली असताना पुन्हा एकदा गावांचा विकास, समस्या कशा सोडवणार यासह नवीन प्रस्ताव करून देण्याचा आदेश सहपालकमंत्री मिसाळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रस्तावामध्ये वेळ गेला आणि निवडणूक लागली तर हद्दवाढ होणार नसल्याचाही सूर आहे.

प्राधिकरण विकास निधीचा कटू अनुभवप्राधिकरण स्थापन झाल्यापासून कार्यक्षेत्रातील गावांच्या विकासासाठी शासनाकडून वेगळा असा विकास निधी मिळालेला नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा पगारही विविध परवाना शुल्कातून भागवला जातो. असा प्राधिकरणाचा कटू अनुभव ग्रामस्थांना असल्याने शहरात आल्यानंतर वित्त आयाेगाचा केंद्राकडून मिळणारा निधी बंद होणार आहे. गावांचा विकास होणार नाही, अशीही भीती गावांमध्ये आहे.

हद्दवाढीतील गावांच्या समस्या सोडवू शकलो नसल्याची कबुलीसहपालकमंत्री मिसाळ यांनी पुण्याची हद्दवाढ होऊन दोन वर्षे झाली हद्दवाढीत आलेल्या गावांच्या समस्या अजूनही कायम आहेत, असे सांगत हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांचेही ऐकले पाहिजे, असे कृती समिती समोरच स्पष्ट केले. पण हद्दवाढीला समर्थन करणारे आणि विरोध करणारे या दोघांचेही ऐकल्यानेच इतकी वर्षे हद्दवाढ रखडली आहे, हेही वास्तव आहे.

हद्दवाढ कृती समितीच्या दाव्यानुसार हद्दवाढ का हवी?

  • शहरात विकासासाठी जमीन शिल्लक नाही.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार शहरात मनुष्याला राहण्यास जागा नाही.

विरोधी करणारे का नको म्हणतात?

  • हद्दवाढीत येणाऱ्या गावात नागरीकरण झाल्याने हद्दवाढीनंतर नव्याने नियोजन करणे शक्य नाही.
  • शेत जमिनीवर आरक्षण पडणार, आरक्षण उठविण्यासाठीच्या बाजारात बळी जाणार.

हद्दवाढीच्या निर्णयाला फार विलंब झाला आहे. आता तातडीने निर्णय घेऊन शासनाने हद्दवाढ करावी. -आर. के. पोवार, निमंत्रक, शहर हद्दवाढ समन्वय कृती समिती, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण