शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कंत्राटी शेतीचे कोणतेही फायदे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि स्टुडंटस् फेडरेशनतर्फे आयोजित किसानपुत्र संघर्ष यात्रेच्या प्रारंभावेळी न्यू ...

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि स्टुडंटस् फेडरेशनतर्फे आयोजित किसानपुत्र संघर्ष यात्रेच्या प्रारंभावेळी न्यू कॉलेजमध्ये ते बोलत होते. सरकारला हमीभावाचा कायदा करायला कोणतीही अडचण नाही. सरकारने अर्थसंकल्पामध्येही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले. सरकारने अन्यायकारक तीन कृषी विधेयके मागे घ्यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय युवक शांत बसणार नसल्याचे यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलांनी उचललेले पाऊल हे शाहू महाराज यांच्या शेती धोरणाची सुसंगत असल्याचे न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी सांगितले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पांडुरंग धनगर (कोथळी), परशुराम अलकनुरे (गडहिंग्लज) यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बी. एल. बर्गे, टी. के. सरगर, धीरज कठारे, हर्षवर्धन कांबळे, संदेश माने, केदार तहसीलदार, योगेश कसबे, कृष्णा पानसे, बाबुराव घुरके, जावेद तांबोळी, सुनील कोळी, अजिंक्य बेर्डे, राम करे, प्रदीप फोंडे, संकेत कदम, श्रीकांत कोळी, आदी उपस्थित होते. शाहीर रणजित कांबळे यांनी शेतकरी, प्रेरणादायी गीते सादर केली. यूथ फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा आरती रेडेकर यांनी स्वागत केले. स्टुडंटस फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांनी संघर्ष यात्रेचे स्वरूप सांगितले. जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे यांनी आभार मानले.

चौकट

यात्रेच्या माध्यमातून जनजागरण

चळवळीची गाणी गात, घोषणा देत अनेक मोटर सायकली, चारचाकी सजवून किसान पुत्र संघर्ष यात्रेतील युवक, युवती, कार्यकर्त्यांनी शाहू समाधीस्थळ येथे येऊन अभिवादन केले. शिंगणापूरमध्ये शेतकऱ्यांची जनजागरण सभा घेण्यात आली. त्यानंतर यात्रा सांगलीच्या दिशेने रवाना झाली. सातारा, पुणे आणि दिल्ली येथे यात्रा जाणार आहे. मुंबईतून दि. ८ राज्यभरातील सर्व जथ्ये गुजरात, राजस्थान मार्गे सिंधू बॉर्डरला पोहोचणार असल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले.

चौकट

अन्यायकारी कृषी कायदे मागे घ्या

संघर्ष यात्रेच्या प्रारंभावेळी ‘जय जवान जय किसान’, ‘कौन बनाया हिंदुस्तान भारत के मजदूर किसान’, ‘शेतकरी राजा आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘अन्यायकारी कृषी कायदे मागे घ्या’, ‘छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या शेती धोरणाचा विजय असो’ अशा घोषणांनी तरुणाईने न्यू कॉलेजचा परिसर दणाणून सोडला.