शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

..तर ऊस तोडणी बंद पाडणार; शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 18:42 IST

इचलकरंजी : हार्वेस्टर मशीनने तोडलेल्या उसाची मोळी बांधणीचा दर एक टक्का करावा, यासंबंधी गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. ...

इचलकरंजी : हार्वेस्टर मशीनने तोडलेल्या उसाची मोळी बांधणीचा दर एक टक्का करावा, यासंबंधी गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र, बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे साखर आयुक्तांचे सोमवारी (दि.२२) जे काही आदेश येतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले. तर आंदोलन अंकुश व जय शिवराय किसान संघटनेने सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास ऊस तोडणी बंद पाडण्याचा व आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यामुळे या निर्णयाकडे साखर कारखानदार व संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे.मशीन तोडसाठी उसाची पाच टक्के कपात अन्यायकारक असून, ती एक टक्के करावी, या मागणीसाठी आंदोलन अंकुश व जय शिवराय किसान संघटना यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे प्रबोधन, ऊसतोडणी बंद, उपोषण या मार्गे आंदोलन सुरू आहे. मात्र, साखर कारखानदार याला न जुमानता तोडणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या चर्चेतून ठोस निर्णय होऊ शकला नाही. परंतु प्रांताधिकारी खरात यांनी साखर आयुक्तांकडून आदेश मागवून त्याचे पत्र सोमवारी आंदोलकांना देणार असल्याचे सांगितले.यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जयसिंगपूरचे उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, अप्पर तहसीलदार शरद पाटील, कारखान्याचे प्रतिनिधी किरण कांबळे, उदय पाटील, सर्जेराव वावरे, सी.एस. पाटील यांच्यासह संघटनेचे सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, शीतल कांबळे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने