शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 18:07 IST

कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक बुडणार नाहीसोमवारी ढोलताशांसह वसुली

कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नेत्यांचा करार रद्दची मागणी होत असली तरी कायद्याने तो आता मोडता येणार नाही. जर ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने थकविलेली ऊसबिले आणि जिल्हा बॅँकेने कंपनीशी केलेल्या कराराबाबत चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेवर मोर्चा काढला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, मागील हंगामातील उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यंदा ‘न्यूट्रियंट्स’ला ऊस मिळणे अवघड आहे. त्यासाठी त्यांना काटा पेमेंट करूनच ऊस खरेदी करावा लागणार आहे.

‘पंचगंगा’, ‘गायकवाड’ हे कारखानेही भाडेतत्त्वावर दिले, त्याप्रमाणेच चंदगडच्या शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून ‘दौलत’ भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. ‘न्यूट्रियंट्स’ पैसे थकविणार हे आम्हाला कसे माहीत? करार रद्द करण्याची मागणी केली असली तरी कराराचे उल्लंघन झाले तरच हा निर्णय होईल.

‘न्यूट्रियंट्स’ने आतापर्यंत बॅँकेचे पैसे भागविले आहेत. मार्च २०१८ पर्यंत दहा कोटींचा हप्ता द्यायचा आहे. तो थकला तर त्यांच्याशी केलेला करार रद्द होईल; पण त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढावी लागेल, असेही अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

बॅँकेच्या कर्मचारी युनियनशी झालेल्या कराराबाबत बोलताना अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ९ नोव्हेंबर २००९ रोजी बॅँकेवर प्रशासक आले; पण १३ नोव्हेंबरला त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. करार झाला; पण त्याच्या अंमलबजावणीत गडबड झाली आहे. ९ ते १३ नोव्हेंबर या काळात विषयपत्रिका व प्रोसीडिंगमध्ये बऱ्याच भानगडी झाल्या आहेत. बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी हे केले असून, केवळ बॅँकेच्या हितासाठी गप्प बसलो आहे.

बॅँक संचित तोट्यात असताना कर्मचारी आपले फरकाचे पैसे मागत असतील तर काय निर्णय घ्यायचा? तरीही युनियनशी आमचा सुसंवाद होता; पण ‘नाबार्ड’च्या तपासणीवेळी त्या अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांनी बॅँकेची बदनामी केल्याने त्या दिवसापासून सुसंवाद संपल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा बॅँक बुडणार नाहीजिल्हा बॅँक बुडणार असे आम्ही कधीच म्हणालो नाही. केवळ अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा, अशी आमची भावना होती. जिल्हा बॅँकेची स्थापना अमावस्येदिवशी झाल्याने ती कधीच बुडणार नसल्याचे स्पष्टीकरणही मुश्रीफ यांनी दिले.

सोमवारी ढोलताशांसह वसुलीछोटे थकबाकीदार राहिले आहेत. त्यांच्या वसुलीसाठी सोमवारी (दि. २०) ढोलताशांसह वसुली मोहीम राबविली जाणार आहे. राधानगरी स्टार्चकडे ३३ कोटी ७० लाख, तर ‘भोगावती कुक्कुटपालन’कडे ५ कोटी ८४ लाखांची थकबाकी आहे. यासाठी अनुक्रमे बी. के. डोंगळे व वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या घरांवर ढोलताशे घेऊन जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफbankबँक