शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 18:07 IST

कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक बुडणार नाहीसोमवारी ढोलताशांसह वसुली

कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नेत्यांचा करार रद्दची मागणी होत असली तरी कायद्याने तो आता मोडता येणार नाही. जर ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने थकविलेली ऊसबिले आणि जिल्हा बॅँकेने कंपनीशी केलेल्या कराराबाबत चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेवर मोर्चा काढला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, मागील हंगामातील उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यंदा ‘न्यूट्रियंट्स’ला ऊस मिळणे अवघड आहे. त्यासाठी त्यांना काटा पेमेंट करूनच ऊस खरेदी करावा लागणार आहे.

‘पंचगंगा’, ‘गायकवाड’ हे कारखानेही भाडेतत्त्वावर दिले, त्याप्रमाणेच चंदगडच्या शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून ‘दौलत’ भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. ‘न्यूट्रियंट्स’ पैसे थकविणार हे आम्हाला कसे माहीत? करार रद्द करण्याची मागणी केली असली तरी कराराचे उल्लंघन झाले तरच हा निर्णय होईल.

‘न्यूट्रियंट्स’ने आतापर्यंत बॅँकेचे पैसे भागविले आहेत. मार्च २०१८ पर्यंत दहा कोटींचा हप्ता द्यायचा आहे. तो थकला तर त्यांच्याशी केलेला करार रद्द होईल; पण त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढावी लागेल, असेही अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

बॅँकेच्या कर्मचारी युनियनशी झालेल्या कराराबाबत बोलताना अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ९ नोव्हेंबर २००९ रोजी बॅँकेवर प्रशासक आले; पण १३ नोव्हेंबरला त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. करार झाला; पण त्याच्या अंमलबजावणीत गडबड झाली आहे. ९ ते १३ नोव्हेंबर या काळात विषयपत्रिका व प्रोसीडिंगमध्ये बऱ्याच भानगडी झाल्या आहेत. बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी हे केले असून, केवळ बॅँकेच्या हितासाठी गप्प बसलो आहे.

बॅँक संचित तोट्यात असताना कर्मचारी आपले फरकाचे पैसे मागत असतील तर काय निर्णय घ्यायचा? तरीही युनियनशी आमचा सुसंवाद होता; पण ‘नाबार्ड’च्या तपासणीवेळी त्या अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांनी बॅँकेची बदनामी केल्याने त्या दिवसापासून सुसंवाद संपल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा बॅँक बुडणार नाहीजिल्हा बॅँक बुडणार असे आम्ही कधीच म्हणालो नाही. केवळ अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा, अशी आमची भावना होती. जिल्हा बॅँकेची स्थापना अमावस्येदिवशी झाल्याने ती कधीच बुडणार नसल्याचे स्पष्टीकरणही मुश्रीफ यांनी दिले.

सोमवारी ढोलताशांसह वसुलीछोटे थकबाकीदार राहिले आहेत. त्यांच्या वसुलीसाठी सोमवारी (दि. २०) ढोलताशांसह वसुली मोहीम राबविली जाणार आहे. राधानगरी स्टार्चकडे ३३ कोटी ७० लाख, तर ‘भोगावती कुक्कुटपालन’कडे ५ कोटी ८४ लाखांची थकबाकी आहे. यासाठी अनुक्रमे बी. के. डोंगळे व वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या घरांवर ढोलताशे घेऊन जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफbankबँक