शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

..तर न्यायाधीशांनाही टप्प्यांमध्ये पगार द्या, एफआरपी याचिकेवरील निकालाच्या विलंबावरुन राजू शेट्टींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:05 IST

मुख्य न्यायमूर्ती यांना खरमरीत पत्र, सुनावणी नसल्याने उत्पादकांचे नुकसान

कोल्हापूर : ऊस एफआरपीत मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात २०२२ मध्ये याचिका दाखल केली आहे. मात्र, याची सुनावणी होऊन निकालास विलंब होत आहे. यामुळे ‘एफआरपी’त तोडमोड केल्याने ज्याप्रमाणे ऊसउत्पादकांना तीन टप्प्यांत पैसे मिळत आहेत, त्याप्रमाणे न्यायाधीशांनाही तीन टप्प्यांत पगार द्यावा, अशी मागणीचे खरमरीत पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे गुरुवारी केली आहे.पत्रात म्हटले आहे, अनेकवेळा याचिका सुनावणीसाठी घेण्यासाठी अर्ज केल्याचे मला माझ्या वकिलांनी कळवले. तरी देखील प्रकरणाची सुनावणी का लागत नाही? न्यायदेवता न्याय देण्याऱ्यांसाठी आहे की न्याय मागणाऱ्यांसाठी? हा प्रश्न पडला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची राजरोसपणे पायमल्ली करत राज्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम राज्य सरकारकडून केले आहे. तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा बेकायदेशीर निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ऊसउत्पादक शेतकरी संकटात आला आहे. ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा करण्याचा केंद्र सरकारने कायदा केला आहे. मात्र, राज्य सरकार पुढील एक वर्षात म्हणजे २६ व्या महिन्यात अंतिम ऊस बिल घ्यायचे अशा पद्धतीचा कायदा करून उत्पादकांची पिळवणूक करीत आहे. शेतकरी बेदखलदोन वर्षांपासून उच्च न्यायालयात न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, न्यायव्यवस्थेनेही शेतकऱ्यांना बेदखल केले आहे. ऊसउत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर ही न्यायव्यवस्था नेमकी कुणासाठी आहे, हा प्रश्न पडला आहे. ज्या न्यायाधीश यांच्याकडे याचिका दाखल केली आहे, त्यांना गेल्या दोन वर्षांत निर्णय घेण्यास का वेळ मिळाला नसेल? म्हणून आपण याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयातील संबंधित न्यायाधीशांना द्यावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसCourtन्यायालयRaju Shettyराजू शेट्टी