शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

..तर न्यायाधीशांनाही टप्प्यांमध्ये पगार द्या, एफआरपी याचिकेवरील निकालाच्या विलंबावरुन राजू शेट्टींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:05 IST

मुख्य न्यायमूर्ती यांना खरमरीत पत्र, सुनावणी नसल्याने उत्पादकांचे नुकसान

कोल्हापूर : ऊस एफआरपीत मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात २०२२ मध्ये याचिका दाखल केली आहे. मात्र, याची सुनावणी होऊन निकालास विलंब होत आहे. यामुळे ‘एफआरपी’त तोडमोड केल्याने ज्याप्रमाणे ऊसउत्पादकांना तीन टप्प्यांत पैसे मिळत आहेत, त्याप्रमाणे न्यायाधीशांनाही तीन टप्प्यांत पगार द्यावा, अशी मागणीचे खरमरीत पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे गुरुवारी केली आहे.पत्रात म्हटले आहे, अनेकवेळा याचिका सुनावणीसाठी घेण्यासाठी अर्ज केल्याचे मला माझ्या वकिलांनी कळवले. तरी देखील प्रकरणाची सुनावणी का लागत नाही? न्यायदेवता न्याय देण्याऱ्यांसाठी आहे की न्याय मागणाऱ्यांसाठी? हा प्रश्न पडला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची राजरोसपणे पायमल्ली करत राज्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम राज्य सरकारकडून केले आहे. तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा बेकायदेशीर निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ऊसउत्पादक शेतकरी संकटात आला आहे. ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा करण्याचा केंद्र सरकारने कायदा केला आहे. मात्र, राज्य सरकार पुढील एक वर्षात म्हणजे २६ व्या महिन्यात अंतिम ऊस बिल घ्यायचे अशा पद्धतीचा कायदा करून उत्पादकांची पिळवणूक करीत आहे. शेतकरी बेदखलदोन वर्षांपासून उच्च न्यायालयात न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, न्यायव्यवस्थेनेही शेतकऱ्यांना बेदखल केले आहे. ऊसउत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर ही न्यायव्यवस्था नेमकी कुणासाठी आहे, हा प्रश्न पडला आहे. ज्या न्यायाधीश यांच्याकडे याचिका दाखल केली आहे, त्यांना गेल्या दोन वर्षांत निर्णय घेण्यास का वेळ मिळाला नसेल? म्हणून आपण याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयातील संबंधित न्यायाधीशांना द्यावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसCourtन्यायालयRaju Shettyराजू शेट्टी