शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर कोल्हापूरचे पाणी तोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:10 IST

कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले,

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचा इशारा पंचगंगा प्रदूषणप्रश्नी हरित लवादाने मागितले स्पष्टीकरणराष्ट्रीय हरित लवाद व पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दणका दिला

कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले, तर नदीतील पाणी प्रदूषित करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर पाटबंधारे विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस पाठवून पाणीपुरवठा खंडित करण्याचा, तसेच दंडनीय दराने पाणीपट्टी आकारण्याचा इशारा दिला.

शहरातील ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असूनही तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यातून कोल्हापूर महानगरपालिकेचा निष्काळजीपणा समोर आल्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद व पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दणका दिला. याप्रकरणी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन सर्व यंत्रणांचे लक्ष वेधले होते.

पुणे येथील राष्टÑीय हरित लवादासमोर नदीच्या प्रदूषणाबाबत सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्ते सुनील केंबळे यांनी ‘लोकमत’ची कात्रणे लवादासमोर सादर करून पंचगंगा प्रदूषणास महानगरपालिका कशी जबाबदार आहे, हे दाखवून दिले. लवादाचे न्यायाधीश यू. डी. साळवी व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नंदा यांनी या संदर्भात महानगरपालिकेने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश दिला. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होत असून, त्यावेळी हे स्पष्टीकरण देण्यात येईल, असे मनपाचे पर्यावरण अभियंता व्याघ्रांबरे यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांनी प्रदूषण नियंत्रणमंडळ, तसेच महानगरपालिकेला नोटीस दिली. कोल्हापूर शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रियेशियाय थेट पंचगंगा नदीत सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याबाबत पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगण्यात आले असून, महानगरपालिकेला दंडनीय दराने पाणीपट्टी आकारण्याचा, तसेच शहराचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.‘लोकमत’ इम्पॅक्टगेल्या पंचेचाळीस दिवसांपासून शहरातील सर्वच्या सर्व मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असूनही महानगरपालिका यंत्रणा सुस्त असल्याबद्दल ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकून हा गंभीर विषय ऐरणीवर आणला. त्यानंतर जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी महानगरपालिकेस नोटीस दिली.एवढेच नाही तर राष्टÑीय हरित लवादाने स्पष्टीकरण मागितले. तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. गेल्या ४५ दिवसांपासून निष्क्रिय वागणाºया मनपा प्रशासनास यामुळे चांगलाच दणका बसला आहे.प्रदूषणाचा अखेर पंचनामागेल्या पंचेचाळीस दिवसांपासून कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शुक्रवारी पंचगंगा नदीचा पंचनामा करण्यात आला. प्रांताधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीने जयंती, दुधाळी नाला, राजाराम बंधारा, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा चार ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यासंबंधीचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाईल. -वृत्त/हॅलो १प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवरपंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. तुटलेली पाईपलाईन जोडून पूर्ववत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास का विलंब लावला जात आहे, अशी विचारणाही सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते. -वृत्त/हॅलो ३

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण