शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Kolhapur: उन्हाचा तडाखा!, राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी फेब्रुवारीतच खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:31 IST

चार वर्षांनंतर हिप्परगीचे बॅकवॉटर नाही : यंदा पाण्याचे नियोजन करावे लागणार

संदीप बावचेजयसिंगपूर : यंदा कमी झालेला पाऊस आणि कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजजवळ कमी झालेली पाणीपातळी यामुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर चार वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तयारी सुरु झाली आहे.हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे मार्च, एप्रिलपर्यंत राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याची गरज भासत नव्हती. उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यातच कोयना धरणात देखील पाण्याचा कमी साठा आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कृष्णा नदीची पाणीपातळी वारंवार कमी होत आहे.राजापूर बंधारा जवळपासून ४० हून अधिक गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे. पावसाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर पूरसदृश स्थिती निर्माण होते. पावसाची संततधार आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला की कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होते. पाण्याचा विसर्ग सुरु झाला की शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरायला सुरुवात होते. मात्र कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे गेल्या चार वर्षापासून तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर बरग्याविना १३ फुटहून अधिक पाणी पातळी मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत पाहायला मिळत होती. त्यामुळे या बॅकवॉटरच्या परिस्थितीवरुन तज्ज्ञ समिती नेमून अभ्यासाची गरज असल्याची चर्चा झाली होती. राजापूरपासून ९० किलोमीटर असणाऱ्या हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे पाण्याचा समतोल पहायला मिळत होता. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.बरगे घालणार..

  • मात्र गेल्या चार वर्षांनंतर कर्नाटकातील हिप्परगीचा बॅकवॉटर कमी झाल्यामुळे राजापूर बंधाऱ्यावर फेब्रुवारी महिन्यातच पाणीपातळी खालावली आहे.
  • शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी