शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Kolhapur: उन्हाचा तडाखा!, राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी फेब्रुवारीतच खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:31 IST

चार वर्षांनंतर हिप्परगीचे बॅकवॉटर नाही : यंदा पाण्याचे नियोजन करावे लागणार

संदीप बावचेजयसिंगपूर : यंदा कमी झालेला पाऊस आणि कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजजवळ कमी झालेली पाणीपातळी यामुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर चार वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तयारी सुरु झाली आहे.हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे मार्च, एप्रिलपर्यंत राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याची गरज भासत नव्हती. उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यातच कोयना धरणात देखील पाण्याचा कमी साठा आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कृष्णा नदीची पाणीपातळी वारंवार कमी होत आहे.राजापूर बंधारा जवळपासून ४० हून अधिक गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे. पावसाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर पूरसदृश स्थिती निर्माण होते. पावसाची संततधार आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला की कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होते. पाण्याचा विसर्ग सुरु झाला की शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरायला सुरुवात होते. मात्र कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे गेल्या चार वर्षापासून तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर बरग्याविना १३ फुटहून अधिक पाणी पातळी मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत पाहायला मिळत होती. त्यामुळे या बॅकवॉटरच्या परिस्थितीवरुन तज्ज्ञ समिती नेमून अभ्यासाची गरज असल्याची चर्चा झाली होती. राजापूरपासून ९० किलोमीटर असणाऱ्या हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे पाण्याचा समतोल पहायला मिळत होता. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.बरगे घालणार..

  • मात्र गेल्या चार वर्षांनंतर कर्नाटकातील हिप्परगीचा बॅकवॉटर कमी झाल्यामुळे राजापूर बंधाऱ्यावर फेब्रुवारी महिन्यातच पाणीपातळी खालावली आहे.
  • शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी