शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

राक्षसांची युद्धे संपली, दंगली करतात माणसेच; भीमराव पांचाळे यांचे गझलमधून भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:04 IST

कोल्हापूर : माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे? असा सवाल उपस्थित करत गझलनवाज भीमराव ...

कोल्हापूर : माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे? असा सवाल उपस्थित करत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी कोल्हापुरात मंगळवारी (दि.१७) रात्री केशवराव भोसले नाट्यगृहात आपली शब्दसुरांची भावयात्रा रंगवली. राक्षसांशी राक्षसांची सर्व युद्धे संपली दंगली करतात आता माणसांशी माणसे अशी वेदना मांडत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.येथील प्रयोदी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पांचाळे यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. औपचारिक कार्यक्रमानंतर दोन तासाहून अधिक वेळ पांचाळे यांनी आपल्या सुरमयी गझलांनी रसिकांना डोलवले. डॉ. प्रवीण कोडोलीकर आणि योगिता कोडोलीकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो माेगरा असावा’ असे सांगतानाच‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठेपुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठेरोज अत्याचार होतो आरशावरती आताआरशाला भावलेली माणसे गेली कुठे’ असा अस्वस्थ करणारा प्रश्नही पांचाळे यांनी उपस्थित केला.

‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे,त्यांनी कसे ऋतुंशी वागायला हवे’ अशा वास्तवाची जाणीव करून देतानाच पांचाळे यांनी‘हारण्यास एक नवा डाव पाहिजेसाकळे जुना नवीन घाव पाहिजे’ अशी संघर्षाची वृत्तीही आपल्या गझल गायनातून स्पष्ट केली. ‘जीवनाला दान’,‘ आसवांचे जरी हासे’,‘मज नको हे गगन’,‘तू नभातले तारे’,‘रोशनीचे कायदे’ या गझला सादर केल्या.‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अन् काळी कायमहागाईन पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय...रक्त लालच आहे सर्वांचे कशास मग ही भेदभावनासगळ्यांना मातीत जाणे कुणबी काय, माळी काय’असे विषण्ण वास्तव मांडल्याने नाट्यगृहातील रसिकही गंभीर झाले. तत्पूर्वी झालेल्या औपचारिका कार्यक्रमात ५१ वर्षे गझल सेवा करणाऱ्या पांचाळे यांचा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सरोज बिडकर उपस्थित होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर