शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बँडबाजा वाजवत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच टाकला कचरा, कोल्हापुरातील कबनूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:12 IST

यावेळी नागरिकांचा ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याबरोबर शाब्दिक वाद झाला

विवेक स्वामीकबनूर : येथील डेक्कन रोडवरील मातंग समाज मंदिराशेजारी नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. या कचऱ्याचा उठाव वेळच्यावेळी होत नाही. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. मातंग समाजाच्या वतीने वारंवार ग्रामपंचायतीस सूचना देऊनही हा कचरा हटवला जात नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हा कचरा बँजोच्या-तालावर वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकला.कबनूरमध्ये घनकचरा टाकण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने गावातील घंटागाडी व कचरा उठाव बंद आहे. त्यामुळे नागरिक मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा आणून टाकतात. डेक्कन रोड परिसरामध्ये मातंग समाज मंदिर, प्रार्थना स्थळे, शाळा, दवाखाने आहेत. याच परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडले आहेत. हा कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.सामाजिक कार्यकर्ते कुंदन आवळे यांनी ग्रामपंचायतीकडे याप्रश्नी वारंवार पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायतीकडून याप्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बँजो वाद्य वाजवत हा कचरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणून टाकला. यावेळी ग्रामसेवक गणपत आदलिंग, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील यांच्याबरोबर शाब्दिक वाद झाला. यावेळी अनिल गवरे, अनिल आवळे, दिलीप आवळे, राजू आवळे, तानाजी कांबळे, नितीन गवरे, राजू गवरे, ममता हेगडे, आक्काताई आवळे, लक्ष्मी हेगडे, रूक्मीणी कांबळे, शोभा गवरे, रेखा आवळे, लता आवळे, कांचन गवरे, यांच्यासह भागातील नागरिक सहभागी होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत