शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

कोल्हापुरात गव्यांचा मुक्काम वाढला; चारा, पाण्यामुळे पाय निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:35 IST

गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच

कोल्हापूर : रमणमळा परिसरातील शेतात असलेले मुबलक गवत आणि पाण्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहरात असलेला गव्यांचा मुक्काम वाढला असून त्यांचा पाय परतीच्या वाटेने निघेना. रविवारी हे गवे शहरात मुख्य वस्तीत येऊ नयेत यासाठी वनविभागाकडून शिकस्त होत आहे.जयंती नाला परिसर ते महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या शेताकडे जाणाऱ्या वाटा वनविभागाने सुरक्षेसाठी बंद केल्या आहेत. या परिरसरात सहा गव्यांचा कळप मुक्कामी आहे. पंचगंगा नदीकाठावरच्या गवताची त्यांना भुरळ पडली आहे. येथील शेतकऱ्यांनी रविवारीही यातील काही गवे दिसल्याचा दावा केला आहे.या गव्यांचा रमणमळा परिसरात वावर कायम राहिल्याने वनविभागाने आपली गस्तही कायम ठेवली आहे. आठजणांच्या संयुक्त रेस्क्यू टीमने दिवसभर गस्त घातली. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून पथकातील वनकर्मचाऱ्यांनी हे गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली. हे गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच आहेत.पूर्ण वाढ झालेल्या या गव्यांचा कळप परिसरातील उसातच मुक्काम ठोकून आहे. करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रात्रपाळीत गस्त घालत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग