शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Police recruitment: शारीरिक चाचणीच्या निर्णयाने फायदा; विद्यार्थी, मार्गदर्शकांनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:42 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४० हजार विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात.

कोल्हापूर : पोलीस भरतीसाठी आता पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय चांगला आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या चाचणी आणि रिक्त पद भरतीच्या निर्णयाचे कोल्हापुरातील विद्यार्थी, मार्गदर्शकांनी स्वागत केले.

सुमारे ४० हजार जण तयारी करतात

कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी सुमारे ४० हजार विद्यार्थी करतात. त्यात अधिकतर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. आरक्षणाची सवलत असल्याने तयारी करणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ५० टक्के आहे.

मार्गदर्शक सांगतात?

आतापर्यंत लेखी परीक्षा आधी आणि नंतर शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वजण लेखी परीक्षा द्यायचे. मात्र, त्यातील अनेकजण शारीरिक चाचणीत अपात्र ठरायचे. या प्रक्रियेत शासनाचा वेळ जायचा. आता त्याची बचत होणार आहे. शारीरिक चाचणी आधी घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. - जॉर्ज क्रूझ, कोल्हापूर.

शारीरिक चाचणी की लेखा परीक्षा आधी याबाबतचा हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम आता दूर झाला आहे. या चाचणी निर्णयामुळे ‘फिट आणि हिट’ पोलीस कर्मचारी मिळणार आहेत. रिक्त पद भरतीबाबतचा समाधानकारक निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागावे. - अभय पाटील, कोल्हापूर.

विद्यार्थी म्हणतात?

लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक चाचणी घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचा माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. - सुमित महाडिक, इचलकरंजी

शारीरिक चाचणी आधी घेण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे आम्हा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. चांगला फायदा होणार आहे. शासनाने आता ही चाचणी ५० ऐवजी १०० गुणांची करावी. - संदीप पाटील, मौजे तासगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस