शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Election: अखेर ठरलं! पाऊस संपताच निवडणुकीचा धुरळा, महापालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:45 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार याबाबत संभ्रम असतानाच राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवार, दि. ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता येथील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्याची पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली.

ज्या महानगरपालिका क्षेत्रात पाऊस कमी आहे तेथे तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी आणि जेथे पाऊस जास्त आहे तेथे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पाऊस संपल्यानंतर निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत, त्यानुसार आयोगाकडून तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक दिवाळीनंतर होणार की पावसाळा संपताच लगेच होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु अधिकृत अशी माहिती कोणाकडेही नव्हती. नागरिकांसह खुद्द महापालिका अधिकारीही संभ्रमात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.

ओबीसीशिवाय आरक्षण सोडत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ही आरक्षण सोडत ओबीसींना वगळून होणार आहे. नगरसेवक पदाच्या ९२ जागांमध्ये ओबीसींना २७ टक्के याप्रमाणे २५ जागा मिळणार होत्या. परंतु, आता ओबीसीचे आरक्षण असणार नाही.त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक झाली तर ती एक ऐतिहासिक घटना असेल.

प्रक्रिया अशी असेल..

  • अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याची नोटीस शुक्रवारी (दि २७ मे) प्रसिद्ध करण्यात येणार.
  • प्रत्यक्ष आरक्षण सोडत ही मंगळवारी (३१ मे) काढणार.
  • सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप दि. १ जूनला प्रसिद्ध.
  • दि. १ ते ६ जूनअखेर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
  • सर्व हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण १३ जूनला शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार.
  • ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाल्यावर आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकते. तो साधारणपणे ३५ ते ४५ दिवसांचा असतो. 

असे असेल आरक्षण

  • एकूण जागा - ९२, वॉर्ड ३१
  • सर्वसाधारण महिला- ४०
  • सर्वसाधारण पुरुष - ३९
  • अनुसूचित जाती महिला ६
  • अनुसूचित जाती पुरुष ६
  • अनुसूचित जमाती महिला- पुरुष १ 

४६ पुरुष, ४६ महिलामहापालिकेच्या नवीन सभागृहात ४६ महिला व ४६ पुरुष नगरसेवक असतील. अनुसूचित जमातीसाठी एक जागेचे आरक्षण आहे. ही जागा पुरुषांसाठी आरक्षित झाली तर सर्वसाधारण प्रवर्गातून पुुरुषासाठीची एक जागा कमी होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक