शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

वस्त्रोद्योगात कामगारांची व्यथा वेगळीच, कल्याणकारी मंडळाची केवळ पोकळ घोषणाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:50 IST

किमान वेतनाचा पत्ता नाही. कल्याणकारी मंडळाची अनेकवेळा फक्त घोषणाच

अतुल आंबी

इचलकरंजी : महाराष्ट्राचे मॅँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहर परिसरात ७५ टक्के उलाढाल वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाशी संलग्न असलेल्या उद्योगातील कामगार आणि वस्त्रोद्योगात प्रत्येक टप्प्यावर काम करणाऱ्यां कामगारांची व्यथा वेगळीच आहे. किमान वेतनाचा पत्ता नाही. कल्याणकारी मंडळाची अनेकवेळा फक्त घोषणाच झाली आहे. वस्त्रोद्योगातील एकूणच खडतर परिस्थितीमुळे कामगारांची स्थिती अतिशय बिकट बनली आहे.

गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनत गेली. त्याप्रमाणे त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक टप्प्यावरील कामगारांचीही अवस्था बिकटच बनली. पूर्वी सव्वा लाख साधे यंत्रमाग होते, ते आता ७५ हजारांवर आले. त्याप्रमाणे पूर्वी ६५ ते ७० हजार असलेले यंत्रमाग कामगार ४५ हजारांवर आले. चार यंत्रमागावर एक कामगार असे नियोजन असायचे. आता आठ, बारा यंत्रमागांवर एकच कामगार काम करीत आहे. नव्या पिढीतील कामगार या क्षेत्राकडे येण्यास तयार नाहीत.

यंत्रमागधारकांना व्यवसायातून चांगला नफा मिळत असल्याने त्यावेळी कामगारांनाही आगाऊ रक्कम (अंगावर बाकी) मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच चांगले काम करणाऱ्या चांगली मजुरी मिळत होती. सध्या बारा यंत्रमाग चालवूनही पूर्वीच्या चार, सहा यंत्रमागांच्या तुलनेतच मजुरी (पगार) मिळत आहे. त्यात महागाई प्रचंड वाढल्याने संसार चालवणे कठीण बनले आहे.शहरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून मजुरीवाढीवर अनेकवेळा आंदोलने झाली. त्यानंतर २०१३ मध्ये महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ देण्याचा करार झाला. त्याप्रमाणे पाच वर्षे सुरळीत गेली; परंतु पुन्हा मंदी, लॉकडाऊन, जीएसटी अशा चक्रात गुरफटून यंत्रमागाचीच घडी विस्कटल्याने मजुरीवाढ रखडली. त्यामुळे कामगारांच्या अडचणी कायम राहिल्या. (समाप्त)

दृष्टीक्षेपात कामगार संख्या

यंत्रमाग कामगार : ४५ ते ५० हजार

सायझिंग कामगार : ३५००

प्रोसेसर्स कामगार : १० हजार

वहिफणी कामगार : १० हजार

कांडीवाले, दिवाणजी, गारमेंट असे वस्त्रोद्योगातील एकूण कामगार सुमारे ८० हजार.

अन्य घटकही वस्त्रोद्योगावर अवलंबून

कामगारांसह वस्त्रोद्योगातील पानपट्टी, हॉटेल, वाहतूक अशा सर्वच व्यावसायिकांची आर्थिक उलाढालही वस्त्रोद्योगातील हालचालींवर अवलंबून असते. या सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात वस्त्रोद्योगाच्या दुरवस्थेचा फटका बसत आहे. शासनाने योग्य धोरण अवलंबून या व्यवसायाला दिशा देणे आवश्यक आहे.

एकसंधपणा आवश्यक

यंत्रमाग व्यवसायातील विविध घटकांची सद्य:स्थिती ‘लोकमत’ने मांडली आहे. यामध्ये शासनस्तरावर प्रयत्न करण्यासाठी राजकीय एकसंधपणा आवश्यक आहे. त्याचबरोबर श्रेय लाटण्यासाठी कोणताही आतातायीपणा न करता विविध संघटनांनीही एकत्रित कृती समिती स्थापन करून या परिस्थितीला तोंड देणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनीही आधुनिकतेची कास धरत जागतिक बाजारपेठ, उलाढाल, तेजी-मंदी, त्यातील कृत्रिमपणा याचा बारकाईने अभ्यास करून व्यवसाय करावा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योग