शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

वस्त्रोद्योगात कामगारांची व्यथा वेगळीच, कल्याणकारी मंडळाची केवळ पोकळ घोषणाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:50 IST

किमान वेतनाचा पत्ता नाही. कल्याणकारी मंडळाची अनेकवेळा फक्त घोषणाच

अतुल आंबी

इचलकरंजी : महाराष्ट्राचे मॅँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहर परिसरात ७५ टक्के उलाढाल वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाशी संलग्न असलेल्या उद्योगातील कामगार आणि वस्त्रोद्योगात प्रत्येक टप्प्यावर काम करणाऱ्यां कामगारांची व्यथा वेगळीच आहे. किमान वेतनाचा पत्ता नाही. कल्याणकारी मंडळाची अनेकवेळा फक्त घोषणाच झाली आहे. वस्त्रोद्योगातील एकूणच खडतर परिस्थितीमुळे कामगारांची स्थिती अतिशय बिकट बनली आहे.

गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनत गेली. त्याप्रमाणे त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक टप्प्यावरील कामगारांचीही अवस्था बिकटच बनली. पूर्वी सव्वा लाख साधे यंत्रमाग होते, ते आता ७५ हजारांवर आले. त्याप्रमाणे पूर्वी ६५ ते ७० हजार असलेले यंत्रमाग कामगार ४५ हजारांवर आले. चार यंत्रमागावर एक कामगार असे नियोजन असायचे. आता आठ, बारा यंत्रमागांवर एकच कामगार काम करीत आहे. नव्या पिढीतील कामगार या क्षेत्राकडे येण्यास तयार नाहीत.

यंत्रमागधारकांना व्यवसायातून चांगला नफा मिळत असल्याने त्यावेळी कामगारांनाही आगाऊ रक्कम (अंगावर बाकी) मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच चांगले काम करणाऱ्या चांगली मजुरी मिळत होती. सध्या बारा यंत्रमाग चालवूनही पूर्वीच्या चार, सहा यंत्रमागांच्या तुलनेतच मजुरी (पगार) मिळत आहे. त्यात महागाई प्रचंड वाढल्याने संसार चालवणे कठीण बनले आहे.शहरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून मजुरीवाढीवर अनेकवेळा आंदोलने झाली. त्यानंतर २०१३ मध्ये महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ देण्याचा करार झाला. त्याप्रमाणे पाच वर्षे सुरळीत गेली; परंतु पुन्हा मंदी, लॉकडाऊन, जीएसटी अशा चक्रात गुरफटून यंत्रमागाचीच घडी विस्कटल्याने मजुरीवाढ रखडली. त्यामुळे कामगारांच्या अडचणी कायम राहिल्या. (समाप्त)

दृष्टीक्षेपात कामगार संख्या

यंत्रमाग कामगार : ४५ ते ५० हजार

सायझिंग कामगार : ३५००

प्रोसेसर्स कामगार : १० हजार

वहिफणी कामगार : १० हजार

कांडीवाले, दिवाणजी, गारमेंट असे वस्त्रोद्योगातील एकूण कामगार सुमारे ८० हजार.

अन्य घटकही वस्त्रोद्योगावर अवलंबून

कामगारांसह वस्त्रोद्योगातील पानपट्टी, हॉटेल, वाहतूक अशा सर्वच व्यावसायिकांची आर्थिक उलाढालही वस्त्रोद्योगातील हालचालींवर अवलंबून असते. या सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात वस्त्रोद्योगाच्या दुरवस्थेचा फटका बसत आहे. शासनाने योग्य धोरण अवलंबून या व्यवसायाला दिशा देणे आवश्यक आहे.

एकसंधपणा आवश्यक

यंत्रमाग व्यवसायातील विविध घटकांची सद्य:स्थिती ‘लोकमत’ने मांडली आहे. यामध्ये शासनस्तरावर प्रयत्न करण्यासाठी राजकीय एकसंधपणा आवश्यक आहे. त्याचबरोबर श्रेय लाटण्यासाठी कोणताही आतातायीपणा न करता विविध संघटनांनीही एकत्रित कृती समिती स्थापन करून या परिस्थितीला तोंड देणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनीही आधुनिकतेची कास धरत जागतिक बाजारपेठ, उलाढाल, तेजी-मंदी, त्यातील कृत्रिमपणा याचा बारकाईने अभ्यास करून व्यवसाय करावा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योग