शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आताच वाढू शकतो साखरेचा विक्री दर; राज्य साखर महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:02 IST

वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर :  वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. तसेच बाजारातील साखरेचा दरही प्रतिक्विंटल ३४०० रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची हीच योग्य वेळ आहे. केंद्र सरकारने  तो  ३,७५० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे. 

गेल्या सहा वर्षांत उसाची एफआरपी पाच वेळा वाढविण्यात आली आहे. ती २,५५० वरून ३,१५० रुपये प्रतिटन झाली आहे. साखरेच्या किमान विक्रीदरात मात्र एकदाच वाढ होऊन तो २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एफआरपीत प्रतिटन शंभर रुपयांची वाढ गेल्या आठवड्यातच केली आहे. याचवेळी साखरेचा विक्री दर वाढविणेही अपेक्षित होते. मात्र, तो वाढला नसल्याने ही मागणी करीत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी म्हटले आहे. 

दरवाढ का हवी ?कृषी मूल्य आयोगाने एफआरपीतील वाढीबरोबरच साखरेच्या किमान विक्रीदरातही वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. साखर किंमत नियंत्रण आदेश १९१८ तील कलम ४ मध्येही एफआरपीव्यतिरिक्त प्रक्रिया खर्च, वित्तीय खर्च यामध्ये दरवर्षी होणाऱ्या बदलाचा आढावा घेऊन साखरेचा किमान विक्रीदर निश्चित केला जाईल, असे म्हटले आहे. मात्र केंद्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मार्जिन मनीसहकारी बँका साखरेच्या मूल्यांकनाच्या आधारे कारखान्यांना कर्ज देत असतात. सध्याच्या दराप्रमाणे मिळणाऱ्या कर्जातून १० टक्के मार्जिन मनी धरल्यास प्रतिटन  १,११० रुपये, तर १५ टक्के मार्जिन मनी धरल्यास १,२३५ रुपये कमी पडतात.  यामुळेच साखरेचा विक्रीदर वाढविण्याची गरज आहे. अन्यथा कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईस येतील.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने