शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आताच वाढू शकतो साखरेचा विक्री दर; राज्य साखर महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:02 IST

वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर :  वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. तसेच बाजारातील साखरेचा दरही प्रतिक्विंटल ३४०० रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची हीच योग्य वेळ आहे. केंद्र सरकारने  तो  ३,७५० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे. 

गेल्या सहा वर्षांत उसाची एफआरपी पाच वेळा वाढविण्यात आली आहे. ती २,५५० वरून ३,१५० रुपये प्रतिटन झाली आहे. साखरेच्या किमान विक्रीदरात मात्र एकदाच वाढ होऊन तो २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एफआरपीत प्रतिटन शंभर रुपयांची वाढ गेल्या आठवड्यातच केली आहे. याचवेळी साखरेचा विक्री दर वाढविणेही अपेक्षित होते. मात्र, तो वाढला नसल्याने ही मागणी करीत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी म्हटले आहे. 

दरवाढ का हवी ?कृषी मूल्य आयोगाने एफआरपीतील वाढीबरोबरच साखरेच्या किमान विक्रीदरातही वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. साखर किंमत नियंत्रण आदेश १९१८ तील कलम ४ मध्येही एफआरपीव्यतिरिक्त प्रक्रिया खर्च, वित्तीय खर्च यामध्ये दरवर्षी होणाऱ्या बदलाचा आढावा घेऊन साखरेचा किमान विक्रीदर निश्चित केला जाईल, असे म्हटले आहे. मात्र केंद्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मार्जिन मनीसहकारी बँका साखरेच्या मूल्यांकनाच्या आधारे कारखान्यांना कर्ज देत असतात. सध्याच्या दराप्रमाणे मिळणाऱ्या कर्जातून १० टक्के मार्जिन मनी धरल्यास प्रतिटन  १,११० रुपये, तर १५ टक्के मार्जिन मनी धरल्यास १,२३५ रुपये कमी पडतात.  यामुळेच साखरेचा विक्रीदर वाढविण्याची गरज आहे. अन्यथा कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईस येतील.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने