शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

Kolhapur: ..तरच जूनपर्यंत पुरेल पाणीसाठा, शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:38 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणांमध्ये १२.७० टीएमसी एवढा जूनपर्यंत पुरेल पाणी साठा आहे. शेतीसाठी पाणी काटकसरीने वापराल तर हा उन्हाळा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणांमध्ये १२.७० टीएमसी एवढा जूनपर्यंत पुरेल पाणी साठा आहे. शेतीसाठी पाणी काटकसरीने वापराल तर हा उन्हाळा सुसह्य होईल. सद्यस्थितीत उपसा बंदी न करता, पाण्याचा अपव्यय न करता त्याचा वापर चिकाटीने, काटकसरीने करण्याचा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार पी.एन. पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, शिल्पा मगदूम-राजे, रोहित बांदिवडेकर, डी.डी. शिंदे, इरिगेशन फेडरेशनच्या वतीने विक्रांत पाटील-किणीकर, भारत पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर.के. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी धरणातील पाणीसाठा नियोजनावर चर्चा झाली.

हसन मुश्रीफ म्हणाले, सध्यातरी पाणी कमी पडेल अशी स्थिती नाही. पण, सगळ्यांनी काटकसरीने त्याचा वापर केला पाहिजे. पाणी साठ्याचा अभ्यास करून रोटेशननुसार तीन आठवड्यांनी ही बैठक घेऊन उपसा बंदीबाबत पडताळणी करावी. सर्वांना पाणी देण्यात येईल. धामणी प्रकल्पाची घळभरणी झाली तर दुधगंगा प्रकल्पावरील ताण कमी होईल. शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांनी सोलर यंत्र बसवून दिवसा पाणी वापर केल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही.अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ तारखेला सिंचनासाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतील दुप्पट वाढीच्या स्थगितीवर चर्चा झाली. त्यावर जुन्या दराने पाणीपट्टी भरण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

उपलब्ध पाणीसाठादुधगंगा प्रकल्प : दुधगंगा प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता ४६ हजार ९४८ हेक्टर असून, त्यापैकी जून २०२३ अखेर ३६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्र निर्मित झाले आहे. एकूण प्रकल्पीय पाणी वापर २७.०६ टीएमसी आहे. सध्या १२.७० टीएमसी पाणीसाठा आहे. या पाण्याच्या नियोजनातून सिंचनासाठी असलेला पाणीसाठा हा ९ टीएमसी आहे. यातील १.८७ टीएमसी पाणी गैबी बोगद्यातून तर दुधगंगा खोऱ्यासाठी ६.५६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. गरज पडल्यास तुळशी प्रकल्पातील पाणी पंचगंगा व भोगावती नदीसाठी वापरले जाईल.

गळती दुरुस्ती दोन महिन्यांनंतरच..काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीसाठी काढलेल्या निविदेची सोमवारी अंतिम मुदत होती. निविदा उघडून त्यांच्या रकमेचे मूल्यमापन करून कमी रकमेची निविदा भरलेल्या व्यक्तीला निविदा मंजूर करणे, वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी आणखी दोन महिने लागणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीHasan Mushrifहसन मुश्रीफguardian ministerपालक मंत्री