शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूर पद्धतीतील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम ३ महिन्यातच गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 20:58 IST

निकृष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात, शेतकऱ्याकडून चौकशीची मागणी

महेश आठल्ये, म्हासुर्ली

कोल्हापूर - म्हासुर्ली धामणी खोऱ्याची जीवनदायी असणाऱ्या धामणी नदीवरील म्हासुर्ली-चौधरवाडी दरम्यानच्या पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची मे महिन्याच्या अखेरीस केलेली दुरुस्ती पावसाळ्यातील अवघ्या दोन-तीन महिन्यातच वाहून गेल्याचे आज बंधाऱ्यास मातीचा बांध घालताना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रकारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असुन हा बंधारा शेतकऱ्यासाठी की,अधिकाऱ्यांच्या 'अर्थ'पूर्ण सोयीसाठी असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे. धामणी खोऱ्यातील अन्य बंधाऱ्यांच्याही याच पद्धतीने एप्रिल मे मध्ये दुरुस्त्या झाल्या असून त्यांची ही अवस्था याहून चांगली नाही. 

संबंधित सर्वच बंधाऱ्याच्या कामाची तसेच अधिकारी व ठेकेदारांच्या साटया-लोट्याची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. धामणी खोऱ्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे.त्यात गेल्या २२ वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नाही. तसेच शासनाच्या पाटबंधारे विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धामणी खोऱ्यात कोनोली - शेळोशी,म्हासुर्ली - चौधरवाडी, भित्तमवाडी - गवशी, पणोरे - हरपवडे, आंबर्डे - वेतवडे गावाच्या दरम्यान धामणी नदीवर 25 ते 40 वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत मात्र सर्वच बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट झाल्याने, सर्व बंधाऱ्यात अपेक्षित पाणीसाठा कधीच होत नाही. भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरलेल्या या कोल्हापूर पद्धतीच्या सर्वसहा गळक्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने गतवर्षी कोट्यावधीचा निधी पाण्यासारखा खर्च केला आहे.मात्र कामे निकृष्ट झाल्यानेत्याचा किती फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. 

मे महिन्याच्या अखेरीस या बंधार्‍याची संबंधित विभागाकडून दुरुस्ती करत असताना निकृष्ट कामाबाबत तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठी?रंगराव चौधरी, शेतकरी, चौधरीवाडी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर