शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कोल्हापूर: फराळे कारखान्याचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुण बेरोजगार, शेतकऱ्यांनाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:15 IST

रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.

सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील फराळे येथील रिलायबल शुगर कारखान्याचा यंदाचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास दीड लाख टन ऊस इतर कारखान्यात पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार असून वाहनधारकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी व वाहनधारक हतबल झाले आहेत.राधानगरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या अनास्थामुळे तालुक्यात साखर कारखानाच काय तर कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारला गेला नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगारासाठी तरुणाचे जथ्थेच्या जथ्थे कागल व शिरोली एमआयडिसीकडे जातात. रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.प्रतिदिन दोन ते अडीच हजार क्रशिंग कपँशिटी असणारा कारखाना प्रत्येक हंगामात दीड दोन लाख गाळप करत होता. आतापर्यंत आठ गळीत हंगाम पुर्ण झाले. यावर्षीचा हंगाम सुरु होण्याची तयारी सुरु असतानाच कारखाना प्रशासनाने अचानक हंगामच बंद केल्याने तीनशे कामगांराच्या नोकरीवरच गंडातर येण्याची भिती आहे. तर तालुक्यातील दीड लाख टन ऊस इतर कारखान्याना परत पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. तसेच अनेक वाहन धारकानाही याचा मोठा फटका बसणार आहे.प्रशासनाने त्वरित लक्ष द्याव३०० कामगार तसेच शेतकरी व वाहनधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने याची दखल घेऊन प्रशासनाने कारखाना सुरु होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

आर्थिक अडचण आल्याने हंगाम वेळेत सुरु झालेला नाही हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे - तुषार राणे - कार्यकारी संचालक, साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने