शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला येणार वेग, कुलपतींनी दिली होती स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:31 IST

हजारो पात्रताधारकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित

कोल्हापूर : राज्यातील अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीवरील बंदी राज्यपाल कार्यालयाने गुरुवारी उठविल्यामुळे शिवाजी विद्यापीठातील ७२ सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग येणार आहे. यामुळे हजारो पात्रताधारकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व अभिमत विद्यापीठांमधील ६५९ सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली होती. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची ६२ व सहयोगी प्राध्यापकांची १०, अशा ७२ पदांचे रोस्टर तयार करून त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारला दिला होता. या प्रस्तावाला ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्जही मागविण्यात आले. ७२ जागांसाठी जवळपास ६ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. कुलपतींनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. मात्र, ही स्थगिती उठविल्यामुळे आता पुन्हा या प्रक्रियेला वेग येणार आहे.निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने चित्रीकरण सीलबंद करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच, त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

वशिलेबाजीला चाप बसणारभरती प्रक्रिया पारदर्शकपणे होत नसल्याच्या तक्रारी आल्याने याला कुलपतींनी स्थगिती दिली होती. आता मात्र या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि नि:पक्षता येण्यासाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ