शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

कोल्हापुरात मुश्रीफ-मंडलिक-महाडिकांची गट्टी; सतेज पाटील, पी.एन. शेट्टी, ठाकरे गटाची कसोटी

By समीर देशपांडे | Updated: July 3, 2023 13:28 IST

जिल्ह्याचे राजकारणच बदलणार

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांनीच शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्याचे राजकारणच बदलणार आहे. यापुढच्या काळात मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांची यापुढच्या राजकारणामध्ये गट्टी दिसणार आहे. आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि ठाकरे गटाला इतर छोट्या-मोठ्या गटांना एकत्रित करून त्यांच्याविरोधात मोट बांधावी लागणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणात गेली काही वर्षे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकांमध्ये यश मिळाले. अगदी ‘गोकुळ’ मध्येही त्यांनी सत्तांतर घडवून आणले. कोल्हापूर महापालिकेतील सत्ता मिळवण्यापासून ते जिल्हा परिषदेत चार वर्षांपूर्वी सत्तांतर करण्यापर्यंत सर्वत्र हे दोघेच प्रामुख्याने जोडण्या घालत होते. परंतु त्यातील मुश्रीफ आता युतीसोबत गेल्याने साहजिकच सतेज पाटील एकाकी पडल्याचे चित्र आहे.सध्या सतेज पाटील यांच्यासोबत पी. एन. पाटील,जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर ही सर्व मंडळींच्या बरोबरच ठाकरे गटही तडफेने सोबत आहे. पुढच्या काळात पाटील बेरजेचे राजकारण करत माजी खा. राजू शेट्टी यांनाही सोबत घेऊ शकतात. त्यामुळे सतेज यांनाच पुढाकार घेऊन पुन्हा एकदा जिल्ह्यात समर्थ विरोधकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. शेट्टी यांचा मुख्यत : राष्ट्रवादी काँग्रेस व त्यातही मुश्रीफ यांच्याशीच संघर्ष होता.अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये यापुढच्या काळात शिवसेना, भाजपसोबत सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपासून अन्य निवडणुकांमध्येही आता हे सर्वजण एकत्र दिसणार आहेत. कागल, आजरा, गडहिंग्लज या तीन तालुक्यांत मुश्रीफ यांचे प्राबल्य आहे. चंदगडचे आ. राजेश पाटील हेदेखील मुश्रीफ यांच्यासमवेत गेले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाची ताकद आहे. पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात अनुक्रमे कोरे, आवाडे यांची ताकद आहे. त्यामुळे ही राज्यातील सत्तारूढ आघाडी आणखी मजबूत झाल्याचे मानले जाते.

सर्व जबाबदारी सतेज यांच्यावरया सगळ्यांना टक्कर देण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. त्यांचाही प्रत्येक तालुक्यात गटही आहे. त्यामुळे कॉंग्रेस, शरद पवार यांच्यासोबत राहणारे नेते, ठाकरे गट आणि स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेकाप अशा सर्वांना एकत्र करून लढाईचे नेतृत्व सतेज पाटील यांना करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक