शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लग्नाच्या याद्यांवर प्रथमच महिलांच्या सह्या, कोल्हापुरातील 'या' गावातील पाटील कुटुंबीयांनी टाकले नवे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:08 IST

सामाजिक विचारांचा जपला वारसा

संदीप बावचेजयसिंगपूर : लग्न ठरविताना सुरुवातीला याद्या लिहिल्या जातात. त्या दोन्ही बाजूच्या बुजुर्ग पुरुष मंडळींकडूनच लिहून एकमेकांकडे घेतल्या जातात. मात्र, शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील पाटील कुटुंबीयांनी नवे पाऊल टाकले आहे. निखिल पाटील व प्रीतल चौगुले यांच्या लग्नाच्या याद्या महिलांच्या सहीनेच झाल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाटील व चौगुले कुटुंबीयांनी महिलांचा सन्मान राखत सामाजिकतेचा संदेश दिला आहे.महिलांचा सन्मान राखण्यासाठी चिपरी येथील पाटील व इचलकरंजी येथील चौगुले परिवाराने लग्नाच्या याद्या महिलांच्या स्वाक्षरीने पूर्ण केल्या. लग्नाच्या याद्या पुरुषच लिहितात ही आजपर्यंतची परंपरा आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान राखता यावा यासाठी एक सामाजिक संदेश देण्यासाठी चिपरी येथील कुमार पाटील व इचलकरंजी येथील सुनील चौगुले या कुटुंबीयांनी एकत्रित निर्णय घेऊन महिलांच्या हस्ते लग्नाच्या याद्या लिहिल्या. या यादीवर दोन्ही कुटुंबातील महिलांची नावे व स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या दोन्ही कुटुंबीयांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम यानिमित्ताने केले आहे. कुमार पाटील यांच्या सुनबाई शर्वरी पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. याद्यांवर कस्तुरी पाटील, उमा खोत, सुनीता पाटील, सोनाली आवटी, अनिता पाटील, शोभा चौगुले, सारिका टारे, पायल मोकाशी, सुजाता कल्याणी, प्रभावती चौगुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सामाजिक विचारांचा जपला वारसामुलगा निखिल याचे पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, पर्यावरण विभाग दिल्ली येथे नोकरीस आहे, तर मुलगी प्रीतल ही प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सासर, माहेरील मंडळींकडे सामाजिक विचारांचा वारसा आहे. कुटुंबातून मुलींनाही स्वातंत्र्य आहे. त्यातूनच ही कल्पना पुढे आली. दोन्ही कुटुंबीयांनी महिलांच्या हस्तेच याद्या लिहिण्यास संमती दिली, अशी माहिती शर्वरी पाटील यांनी दिली.

निर्णयाचे स्वागतलग्न ठरविताना सर्व निर्णय पुरुष घेतात. लग्नाची बोलणी व निर्णयदेखील तेच घेतात. मात्र, पाटील व चौगुले कुटुंबातील महिलांनी हुंड्याला फाटा देऊन हे लग्न ठरविले. शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेऊन ऐतिहासिक पाऊल टाकले होते. त्यानंतर आता लग्नाच्या याद्या लिहून महिलांनी आणखी एक नवे पाऊल टाकले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळmarriageलग्नWomenमहिला