शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
3
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
4
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
5
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
6
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
7
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
8
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
9
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
10
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
11
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
12
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
13
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
14
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
15
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
16
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
17
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
18
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
19
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
20
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली

पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 13:31 IST

विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : तिचं वय अवघे २५ वर्षे. पदरात लहान मूल... सुखी संसार सुरू असताना कोरोनाने पतीचे निधन झाले. दुसऱ्या घटनेत अपघाताने तिचे कुंकू पुसले. तिसरी घटना सीमेवर शहीद झालेल्या जवानानंतर तिच्या सुखांनाही तिलांजली मिळाली.... पण हे दु:ख आयुष्यभर तिने कवटाळून बसण्यापेक्षा पुनर्विवाहाने विधवेच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग भरले आहेत. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात झालेले विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे.

म्हसवे (ता. भुदरगड) येथील स्वाती यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाल्यावर दिराने बाळासह त्यांचा स्वीकार केला. कोरोना, शहीद जवान, अपघाती मृत्यू अशा कोणत्याही कारणाने वैधव्य आलेल्या तरुणींचे विवाह होण्याचे प्रमाण सुदैवाने आता वाढले आहे. ‘विधवेचे लग्न’ हे शब्द उच्चारणेही जिथे गुन्हा वाटायचा, त्या रूढीबंदिस्त मानसिकतेत सकारात्मक बदल घडून आता पुन्हा एकदा तिची लग्नगाठ बांधली जात आहे.कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहासाठी तसेच आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या मुलांना अधिकार मिळावेत यासाठी कायदा केला होता. आताच्या पुढारलेल्या समाजमानसात अजूनही विधवा पुनर्विवाहाचा विषय फारसा रुजलेला नाही. त्यात तिला मूल असेल तर आपल्या मुलाचा वारस रहावा म्हणून कुटुंबीयांची देखील विधवेचे लग्न लावून देण्याची तयारी नसते; पण दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने क्षणभंगूर आयुष्य दाखवून दिले.

त्याकाळात विशेषत: दुसऱ्या लाटेत १८ ते ४५ वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कित्येक मुली-महिलांना विवाहानंतर तीन वर्षांच्या आतच वैधव्य आले आहे अशा विधवांच्या विवाहासाठी आता समाज पुढे येत आहे.मानसिक दडपणपुनर्विवाहाचा विचार आला तरी विधवा महिलांवर आपण अप्रामाणिकपणा करतोय की काय अशी अपराधी भावना असते. कुटुंबीयांचीदेखील तिचे दुसरे लग्न लावून देण्याची तयारी नसते. ग्रामीण भागात मुलींचे लग्न १८-१९ व्या वर्षीच होते. ती २५ वर्षांपर्यंत एक-दोन बाळांची आई झालेली असते. त्यात मूल मोठे असेल तर पुनर्विवाहाचा विषयच काढला जात नाही.कौटुंबिक नव्हे, सामाजिक प्रश्नस्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे समाजात विधवा महिलांची संख्या मोठी आहे. तरीही या विषयाकडे सामाजिक प्रश्न म्हणून नव्हे, तर कौटुंबिक विषय म्हणून पाहिले जाते. अशा स्त्रीने शिक्षण घ्यावे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, तिला पुन्हा पती मिळावा, सुखी संसाराचे सुख मिळावे, हक्काचे कुटुंब मिळावे यासाठी प्रयत्नांची गरज आहे.ही आहे परिस्थितीशासकीय अहवालानुसार कोरोना मृत्यूपैकी २२ टक्के मृत्यू हे ५० पेक्षा कमी वयोगटातील पुरुषांचे आहेत. राज्यात एकूण दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६० टक्के मृत्यू पुुरुषांचे झाले असे धरले तरी ८० ते ९० हजार पुरुषांचे निधन झाले.

विधवा पुनर्विवाहाचे प्रमाण वाढले असले तरी त्याबाबत खूप काम करावे लागणार आहे. विधवांना पुन्हा संसार सुख मिळावे यासाठी चळवळ सुरू केली आहे. अहमदनगर, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन, यवतमाळ, नाशिकमध्येदेखील असे विवाह झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या किमान १०० महिलांचे पुनर्विवाह व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. - हेरंब कुलकर्णी, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूर