शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिंदे सरकार औटघटकेचे, गद्दार ४० आमदार अपात्र होणार; शिवसेना नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:37 IST

वर्षभरात लागणाऱ्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे देखील केलं आवाहन

कोल्हापूर : शिवसेनेने सर्व काही दिलेेले असतानाही गद्दारी करून बाहेर पडलेल्या ४० आमदारांना सोबत घेऊन तयार झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार औटघटकेचे आहे. आगामी काही दिवसांतच शिवसेना सोडून गेलेले आमदार अपात्र होतील. यामुळे वर्षभरात लागणाऱ्या निवडणुकीसाठी तयार रहा, असे आवाहन शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी येथे केले. भाजपची लाचारी पत्करून मुख्यमंत्रिपद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांचे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदाराचे राजकारण संपणार आहे, अशीही टीका त्यांनी केली.शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा झाला. संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. त्यांनी ‘शिवसेना अंगार है..बाकी सब भंगार है’ या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.खासदार राऊत म्हणाले, स्वार्थासाठी शिवसेना सोडलेल्यांनी बेशरम राजकारण केले आहे. हे सर्व करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपद न देता उपमुख्यमंत्रिपद देऊन चांगला धडा शिकवला. फडणवीस यांच्या तालावर मुख्यमंत्री शिंदे यांना नाचावे लागत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना जनतेने घरी बसवले आहे. कोकणातील बुटकेश्वर नारायण राणे यांनाही मतदारांनी धडा शिकवला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेले आता धनुष्यबाणावर दावा करीत आहेत. असे करण्यापेक्षा त्यांनी बापाच्या नावाने पक्ष काढून मते मागावीत.मेळाव्यास जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजीत मिणचेकर, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.

मानेंना ताप, मंडलिक दिल्लीतशिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक मेळाव्यास गैरहजर राहिले. माने यांना ताप आणि मंडलिक हे दिल्लीत आहेत. त्यामुळे दोन्ही खासदार मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

शिंदेंचे हिंदुत्व बेगडी

ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला नवीन मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे शिंदे यांचे हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

सासऱ्यांना आंबोलीतील डोंगार दाखवा की

रविकिरण इंगवले तुमच्या आमदार सासऱ्यांनी गुवाहाटीत जाऊन काय डोंगार, काय झाडी असे म्हटले. त्यांना आंबोलीतील डोंगार आणि झाडी जरा दाखवा, असा सल्ला दूधवडकर यांनी देताच हशा पिकला.

चंद्रकांत पाटील यांना सल्लासंजय पवार म्हणाले, राजेश क्षीरसागर हे गरज आहे म्हणून आता चंद्रकांत पाटील यांचे पाय धरत आहेत; पण गरज संपताच ते पायही ओढतात. त्यामुळे सावध राहा.

यड्रावकर यांना धडा शिकवतील...

शिवसेनेने राजेंद्र यड्रावकर यांना मंत्री केले; पण त्यांनी पक्षाशी बेइमानी केली. त्यांना धडा शिकवून उल्हास पाटील यांच्या पाठीशी मतदार राहतील, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना