शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Kolhapur: ‘बिद्री’ची चौकशी हे प्रकाश आबीटकर यांचेच पाप, के. पी. पाटील यांचा आरोप 

By राजाराम लोंढे | Updated: June 24, 2024 17:34 IST

'आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही, जनताच हिशेब चुकता करेल'

कोल्हापूर : गेली दहा वर्षे ‘राधानगरी’च्या सामान्य माणसाची दिशाभूल करुन पन्नास खोक्याच्या आमिषाने गुवाहाटीला धूम ठोकणाऱ्यांना ‘बिद्री’च्या निवडणूकीत सभासदांनी चारीमुंड्या चित केले. त्या रागापोटी रात्रीच्या वेळी ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी केली. कारखान्याच्या ६५ हजार सभासद व ऊस उत्पादकांच्या कष्टावर उभारलेल्या कारखान्याची बदनामी करण्याचे पाप आमदार प्रकाश आबीटकर यांनी केल्याचा आरोप ‘बिद्री’साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.के. पी. पाटील म्हणाले, सत्तेचे दहा वर्षे विकास कामे कमी आणि बिद्रीच्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कालकीर्द आमदार आबीटकर यांची राहिली. केवळ बिद्री आणि के. पी. पाटील यांच्या द्वेषाने पछाडलेल्या आबीटकर यांनी गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये दिवस आणि रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी प्रयत्न केले. अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. बिद्रीच्या प्रगतीचा शिलेदार ठरलेला सहवीज प्रकल्पाला अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. इथेनॉल प्रकल्पाचे इरादा पत्र, लायसन कोणी आडवले हे कारखान्याच्या सभासदांना माहीती आहे. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्ष निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकला.गुवाहाटी रिटर्न आमदारांना जनतेच्या मनातील खदखदची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते कुरघोडीचे राजकारण करत आहेत. त्यातूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिद्रीची तपासणी करण्यास भाग पाडले. त्यांनी कितीही चौकशा करु देत, सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोरील येईल. असे के. पी. पाटील यांनी सांगितले.

सभासदांनीच योग्य मुहूर्त काढलापावसाचे कारण पुढे करत ‘बिद्री’ची निवडणूक सत्तेच्या जोरावर लांबणीवर टाकली. पण, सभासदांनीच योग्य मुहूर्त काढून कारखान्याच्या चिमणीवर वाकडी नजर टाकणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.विधानसभेला हिशेब चुकता..देशात नावलौकिक मिळवलेल्या ‘बिद्री’ कारखान्याची जेवढी बदनामी करता येईल, तेवढी प्रकाश आबीटकर यांनी केली. आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही. त्या निवडणूकीत ‘राधानगरी’ची जनता त्यांचा हिशेब चुकता करतील, असा विश्वास के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर