शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षात 'प्रोत्साहन अनुदाना'चे पैसे खात्यावर जमा होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:18 IST

राज्य सरकारने ४४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला

कोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार (दि.२) पासून प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या यादीतील १ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ८३ हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत ‘प्रोत्साहन’ अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३१८ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दुसरी यादी आडकली होती. निवडणूक संपताच राज्य सरकारने ५७ हजार ३१० पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवली आहे. त्याच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन्ही यादीतील १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप तीन हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केलेले नाही.ज्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार पासून अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

४४० कोटीचा निधी उपलब्धजिल्ह्यातील १ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने ४४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आता दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.

त्रुटी दुरुस्तीचे कामही सुरूजिल्ह्यात दोन्ही याद्यांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. काही ठिकाणी बँकांची चूक आहे, तर काहींची तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सहकार विभागाच्या पातळीवर सुरू आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी