शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कोल्हापूरची हद्दवाढ थांबविता येणार नाही, राज्यपाल यांनी केले स्पष्ट; विविध मान्यवरांशी केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 11:53 IST

राज्यपाल यांनी आपण २० वर्षांपूर्वी अंबाबाईच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आल्याची आठवण करून दिली

कोल्हापूर : शहरांची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही. हद्दवाढ काही काळ आपण थांबवू शकतो परंतु ती कायमस्वरूपी थांबविता येत नाही असे स्पष्ट प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी येथे केले. समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकासकामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रुजविले जाणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.राजकीय व सामाजिक गटातील मान्यवरांनी चर्चेत हद्दवाढीचा विषय उपस्थित केला. तत्पूर्वी राज्यपाल यांनी आपण २० वर्षांपूर्वी अंबाबाईच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आल्याची आठवण करून दिली. तो संदर्भ घेऊन आपण आल्यापासून आजही कोल्हापूर तसेच आहे. स्थापनेपासून एक इंचही हद्दवाढ झाली नाही. सरकार त्याबाबत गंभीर नाही. हद्दवाढ करण्यात शासन कमी पडते का अशी विचारणा त्यांना करण्यात आली.राज्यपाल यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, शेती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली. जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजीचे प्रशासक ओमप्रकाश दिवटे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यपालांचे पुष्प देऊन स्वागत केले. स्थानिक पातळीवरील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

केशवराव पूर्वीप्रमाणेच..केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत नियोजन केल्यानुसार ते पूर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. त्यांनी गुळाचा वापर मध्यान्ह भोजनात साखरेऐवजी मुलांसाठी करावा याबाबत सुचविलेल्या मुद्दयांवर अधिक चर्चा करू असे आश्वासन दिले. रोजगारक्षम ग्राम संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याविषयांवर मागण्या..जिल्ह्यातील उद्योग वाढ, हद्दवाढ, सार्वजनिक आरोग्य सेवा, खंडपीठ, औद्योगिक विकास, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतीसाठी पाणी, पर्यावरण संरक्षण, पुरावर कायमस्वरूपी तोडगा, गुळाचा वापर शालेय स्तरावर मध्यान्ह भोजनात करणे, आरक्षण आदी विषयांवर मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर