शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

चांदोली विस्थापित मूळ गावाकडे परतू लागले; कोल्हापुरात गेले ३२ दिवस होता ठिय्या 

By संदीप आडनाईक | Updated: February 29, 2024 19:31 IST

कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस ...

कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस वनविभागाच्या दारात ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा बांध फुटल्यामुळे त्यांनी आता थेट मूळ गावाकडे चालत जाण्यास प्रारंभ केला. बुधवारपासून चालायला सुरुवात केलेल्या या आंदोलकांनी गुरुवारी निवळे वाठार तर्फ वडगावात मुक्काम केला.मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गेले ३२ दिवस आंदोलन करणाऱ्या सुमारे ८०० हून अधिक चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी १०० प्रकल्पग्रस्तांना वनविभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी मागे ठेवून मूळ गावी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला. बुधवारी या आंदोलकांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था शालन पाटील यांनी केली. गुरुवारी सकाळी टोप संभापूर या ठिकाणी पेठ वडगाव सोनाळी येथील केजीएन कमिटीने आंदोलकांना जेवणाची व्यवस्था केली तर निवळे वाठार तर्फे वडगावच्या ग्रामकमिटीने त्यांची गुरुवारी रात्रीची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली.नवे पारगाव येथील शेतकरी आंदोलकांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज, शुक्रवार दि. १ मार्च रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नवे पारगाव येथे माजी सभापती प्रदीप राजाराम देशमुख आणि नवे पारगावचे सरपंच करणार आहेत. आंदोलकांचे साहित्य नेण्यासाठी गाडीची व्यवस्था प्रदीप पाटील यांनी केली आहे.या आंदोलनात मारुती पाटील, दाऊद पटेल, रफिक पटेल, आनंदा आमकर, विनोद बडदे, एम. डी. पाटील, जगन्नाथ कुडतुडकर, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, पांडुरंग पवार, दगडू बोडके, प्रदिप पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील, दगडू टेलर, सुभाष पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन