शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur politics: वारं फिरलंय, राजकारणाची दिशाही बदलणार; पण..

By समीर देशपांडे | Updated: November 26, 2024 13:01 IST

महायुती ‘एक है तो सेफ है’, नेत्यांचेही राहणार लक्ष

समीर देशपांडेकोल्हापूर : कधी नव्हे इतकं जिल्ह्यात काँग्रेस आणि मित्रपक्षांचं पानिपत झालं आहे. राज्यातीलच वारं फिरल्यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणार हे निश्चित. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा उठवत जिल्ह्यातील एक-एक सत्तास्थाने ताब्यात घेण्यासाठी महायुती सरसावणार आहे; परंतु ‘एक है तो सेफ है’ या ब्रीदवाक्यानुसार जर महायुतीचे नेते वागणार नसले तरी येणाऱ्या काही महिन्यांत पिछाडीवर गेलेला महाविकास आघाडीचा वाघ पुढे येणारच नाही, असे समजण्याचे कारण नाही.‘एक है तो सेफ है’ हे स्लोगन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुढे आले असले तरीही याचे महत्त्व नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि विनय कोरे हे पूर्वीपासून जाणून आहेत. त्यामुळेच सतेज पाटील मुश्रीफ यांच्याविरोधात प्रचाराला गेले नाहीत हे उघड सत्य आहे. त्यांचे खंदे समर्थक उमेश आपटे हे मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिले हे दुसरे सत्य. यातूनच सत्यजित पाटील एकाकी पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता कोणाची असली तरी जिल्ह्यातील विविध सत्तास्थानांवरील मांड हे तिघे कधीच ढिली होऊ देत नाहीत. काहीवेळा जिल्हा परिषदेसारखा अपवाद मध्ये येतो.या विधानसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला असताना महायुतीच्या नेत्यांच्या अंगात विजयाचे वारे संचारले आहे. ‘गोकुळ’, ‘महापालिका’, जिल्हा परिषद’ ताब्यात घेण्यासाठी नेते आसुसलेले आहेत. तशी इच्छा असणे यात वावगे काहीच नाही. कारण केंद्र आणि राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर करीत स्थानिक स्वराज्य आणि अन्य सहकारी संस्था ताब्यात घेण्याची परंपरा आपल्याकडे खूप जुनी आहे.

आता जिल्ह्यातील १० पैकी ७ जण हे अनुभवी आणि ज्येष्ठ आमदार आहेत. यातील तिघांनी मंत्री म्हणूनही काम केले आहे. यातील एकाला कॅबिनेट मंत्रिपदाचा, तर दुसऱ्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. तरीही आता मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यातून धुसफूस होऊ शकते. ती न वाढवण्यासाठी महायुतीची राज्यस्तरीय नेतेमंडळी खंबीर आहेत; परंतु धुसफूस, समज, गैरसमज यातून मग समाधानकारक तोडगा निघाला नाही आणि न ऐकण्याची वृत्ती वाढली की मग वेगळेच चित्र निर्माण झाले होते.कोल्हापूर महापालिकेला भाजपच्या स्थानिक नेत्यांशी न पटल्याने राजेश क्षीरसागर शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले होते हे जिल्ह्याने पाहिले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाठिंबा देण्यावरून महायुती सत्तेत असतानाही शिवसेना फुटली होती हे देखील वास्तव आहे. त्यामुळेच अधिक दक्षता घ्यावी लागेल.समोर सतेज पाटील यांच्या रूपाने जखमी शेर आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात नेमके काय झाले आहे, याचे विश्लेषण त्यांनी केलेलेच असणार आहे. महापालिकेच्या कोणत्या प्रभागात नेमकी ‘जादू’ काय झाली हे त्यांच्यापर्यंत गेलेले आहे. हातकणंगले, शिरोळ, चंदगड अशा किचकट ठिकाणी पालकमंत्री असताना अजिंक्यताऱ्यावर निधीसाठी फेऱ्या घालणाऱ्यांनी नेमकं काय केलं आहे याचा ‘हिशेब’ त्यांच्याकडे आहे. या एकतर्फी विजयामुळे दुखावलेल्या सर्वांना एकत्र करण्याची क्षमता पाटील यांच्यात आहे. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांना ‘आता काय अडचण’ नाही, अशा भ्रमात राहता येणार नाही.

सर्वांचे समाधान कसे करणार?जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपासून होणार आहेत. महायुतीकडे इच्छुकांची संख्या साहजिकच अधिक आहे. स्थानिक पातळीवर राजकारण टोकाचे होत संधी न मिळालेले अनेकजण विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांचे नसले तरी अधिकाधिक जणांचे समाधान करण्याची कसरत महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबलभाजप १४, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित ११, शिवसेना एकत्रित १०, जनसुराज्य शक्ती ६, ताराराणी आघाडी २, आवाडे गट ३, युवक विकास आघाडी २, स्वाभिमानी २, अपक्ष १.

मावळत्या महापालिकेतील बलाबलकाँग्रेस ३०, राष्ट्रवादी एकत्रित १४, ताराराणी आघाडी १९, भाजप १४, शिवसेना एकत्रित ४

नेत्यांनाही दाखवावी लागणार ताकदआता जे निवडून आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पाठबळ दिलेले आहे. राज्यातील परिस्थितीचा फायदा घेत हेच नेते जिल्ह्यातील महायुतीचे खासदार, आमदार यांंच्यावरही जबाबदारी टाकणार असून त्यावर त्यांचे लक्षही राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणMahayutiमहायुती