शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

By भारत चव्हाण | Updated: September 7, 2023 16:31 IST

भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल

कोल्हापूर : देशातील बेरोजगारी, महागाई, वांशिक दंगली, फोडा आणि झोडा नितीचा वापर, द्वेषाचे राजकारण, दिशाभूल करण्यावर दिला जाणारा जोर या सगळ्या गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला कंटाळा आला असून भाजप सरकारची सर्वसामान्यातील विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका माजी गृह राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ऐन गणेशोत्सवाच्या काळात लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्याचा अजेंडाही अजून प्रसिध्द केलेला नाही. विरोधी पक्षाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. यातून भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.काँग्रेसचे नेते राहूल गांधी संपूर्ण देशभरात बंधुभाव, प्रेमाचे वातावरण तयार करुन जनतेला विश्वास देत असताना दुसरीकडे भाजप सरकारने मात्र द्वेशाचे, सुडाचे राजकारण सुरु केले. सर्व पातळीवर भाजप सरकार फेल झाल्यामुळे फोडा-झोडा निती, दिशाभूल करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. कोणत्याही गंभीर विषयावरुन भरकट नेण्यासाठी भारत की इंडिया यासारखे मुद्दे चर्चेत आणून लोकांचा गुंतवून ठेवले जात आहे, असे पाटील म्हणाले.मणिपूर मधील दंगलीमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे. जगात आपली मान खाली घालावी लागली. दंगली होणार आहेत याची पूर्वकल्पना मिळत असूनही खबरदारी घ्यायची, कारवाई करायची मानसिकता केंद्र सरकारची दिसत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा