शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

By भारत चव्हाण | Updated: September 7, 2023 16:31 IST

भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल

कोल्हापूर : देशातील बेरोजगारी, महागाई, वांशिक दंगली, फोडा आणि झोडा नितीचा वापर, द्वेषाचे राजकारण, दिशाभूल करण्यावर दिला जाणारा जोर या सगळ्या गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला कंटाळा आला असून भाजप सरकारची सर्वसामान्यातील विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका माजी गृह राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ऐन गणेशोत्सवाच्या काळात लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्याचा अजेंडाही अजून प्रसिध्द केलेला नाही. विरोधी पक्षाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. यातून भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.काँग्रेसचे नेते राहूल गांधी संपूर्ण देशभरात बंधुभाव, प्रेमाचे वातावरण तयार करुन जनतेला विश्वास देत असताना दुसरीकडे भाजप सरकारने मात्र द्वेशाचे, सुडाचे राजकारण सुरु केले. सर्व पातळीवर भाजप सरकार फेल झाल्यामुळे फोडा-झोडा निती, दिशाभूल करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. कोणत्याही गंभीर विषयावरुन भरकट नेण्यासाठी भारत की इंडिया यासारखे मुद्दे चर्चेत आणून लोकांचा गुंतवून ठेवले जात आहे, असे पाटील म्हणाले.मणिपूर मधील दंगलीमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे. जगात आपली मान खाली घालावी लागली. दंगली होणार आहेत याची पूर्वकल्पना मिळत असूनही खबरदारी घ्यायची, कारवाई करायची मानसिकता केंद्र सरकारची दिसत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा