शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...तेव्हा एकाच मतदाराने केले होते दोन वेळा मतदान!

By संदीप आडनाईक | Updated: May 4, 2024 12:08 IST

कोल्हापुरातून रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब खर्डेकर, भाऊसाहेब महागांवकर विजयी

संदीप आडनाईक कोल्हापूर : एकाच मतदाराने दोन वेळा मतदान केल्यास आज तो गुन्हा मानला जात असला तरी, पहिल्या लोकसभेला अधिकृतपणे दोन वेळा मतदान करण्याची परवानगी होती. मात्र त्यासाठी काही मतदारसंघ निश्चित केले होते. देशाच्या पहिल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकाच मतदाराने दोन उमेदवारांना निवडून देण्यासाठी चक्क दोन वेळा मतदान केले, हे सांगितले तर आज आश्चर्य वाटेल. कोल्हापूरकरांनी १९५१ मध्ये रत्नाप्पाण्णा कुंभार आणि बाळासाहेब खर्डेकर तसेच १९५७ मध्ये एस. के. डिगे आणि भाऊसाहेब महागांवकर यांना दोन वेळा मतदान केले.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चार वर्षांनी २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ अशा चार महिने चाललेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८९ आणि १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही ९० मतदारसंघ द्विसदस्यीय होते. म्हणजे, एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन सदस्य लोकसभेवर निवडून येत.

त्यावेळी राखीव जागांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नव्हता. यामुळे खुल्या प्रवर्गातून एक आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून दुसरा प्रतिनिधी निवडण्यासाठी एकाच मतदाराने या त्यांना दोन वेळा मतदान केले; पण त्यांना आपली दोन्ही मते एकाच उमेदवाराला देण्याची परवानगी नव्हती.१९६२ पासून आरक्षित मतदारसंघदेशात १९६० पर्यंत एकाच मतदारसंघातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी पाठवण्याची तरतूद असलेले काही मतदारसंघ होते. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ही पद्धत बंद झाली. यानंतर आरक्षित मतदारसंघांची निर्मिती झाली आणि एका मतदारसंघातून केवळ एकच प्रतिनिधी निवडून संसदेत पाठविले. सध्या अनुसूचित जातीचे ८४, अनुसूचित जमातीचे ४७ आणि खुल्या प्रवर्गातील ४१२ मतदारसंघांतून प्रतिनिधी संसदेत पाठविले जातात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान