शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित बिलांसाठी कोल्हापुरात ठेकेदारांची वाहनांसह ‘बांधकाम’वर धडक, राज्यात २७ हजार कोटींची थकबाकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:52 IST

सोमवारी पुण्यातील मुख्य कार्यालयात आंदोलन

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधित राज्यातील ठेकेदारांनी प्रलंबित बिलांसाठी मंगळवारी कोल्हापूर विभागीय कार्यालयावर वाहनांसह धडक दिली. ढोल-ताशांच्या गजरात ठेकेदार आक्रमक झाले होते, बिले दिली नाही तर बँकांच्या तगाद्यामुळे आत्महत्या कराव्या लागतील, असा इशाराही संघटनांनी यावेळी दिला. सोमवारी (दि. २४) पुण्यातील मुख्य कार्यालयावर वाहनांसह धडक देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.राज्यातील ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या आदेशानुसार कामे पूर्ण केली आहेत. या कामांमध्ये बँकांसह इतर वित्तीय संस्थांकडून कोट्यवधींची कर्जे काढून गुंतवले आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कामांची बिले अदा केलेली नाहीत. राज्यातील चार लाख ठेकेदारांचे २७ हजार कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बँकांचे हप्ते थकले आहेत. खडी क्रशर, पुरवठादार, पेट्रोल पंप आदींचे पैसे थकले आहेत. मजुरांचे पगार अंगावर असल्याने ठेकेदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहावयास मिळत आहे.यापूर्वी बांधकाम विभागाला निवेदन देऊन अनेक वेळा प्रलंबित बिलांची मागणी केली होती. मात्र, मंगळवारी महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन, रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर, बिल्डर्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागावर पेव्हर, रोलर, जेसीबी, ट्रक घेऊन ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा काढला.मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे, सचिव संजीव वोरा, खजानीस दत्ताजीराव भोसले, मयूर भोसले, रमेश भोजकर, मिलिंद साखरपे आदी उपस्थित होते.

फुकट्यांना पैसे देता, मग आमचे का नाही?राज्य शासनाकडे विविध योजनांची नुसती खैरात वाटली जात आहे. लोकांना फुकट देण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, आम्ही कामे पूर्ण करून आमचे पैसे देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.‘बांधकाम’ हादरले..बांधकाम विभागात पहिल्यांदाच ठेकेदारांनी आक्रमकपणे आंदोलन केले. ढोल-ताशांचा गजर, शासनाच्या विरोधातील घोषणांनी बांधकाम विभाग हादरून गेले होते.७ टक्क्यांत काय भागवायचे?ठेकेदार आक्रमक झाल्यानंतर राज्य शासनाने सोमवारी प्रलंबित पैशांपैकी केवळ ७ टक्के अदा केले आहेत. मात्र, या पैशात कोणाला भागवायचे, असा सवाल संघटनेचे राज्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार