शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार 

By विश्वास पाटील | Updated: May 2, 2024 13:58 IST

'मोदी यांचे विधान सामाजिक तणाव वाढविण्यासाठीच'

कोल्हापूर : देशात धर्माच्या नावांवर आरक्षण ही संकल्पनाच आम्हांला मान्य नाही. पंतप्रधान मोदी यांनीही असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यास विरोध करू. सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच पंतप्रधान अशी विधाने करत असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.पवार म्हणाले, आम्हाला धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच अमान्य आहे. इंडिया आघाडीचा कोणताही नेता तसे म्हटलेला नाही. आम्ही जातींचे सर्व्हेक्षण करणार आहोत. त्यामुळे आरक्षणाच्या लाभापासून किती गोरगरिब समाज अजूनही बाजूला राहिला आहे यासंबंधीचे नेमके चित्र समोर येईल.तामिळनाडूसारख्या राज्यात एका टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात. मात्र, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यकर्त्यांना जनमत न मिळण्याची चिंता आहे. पंतप्रधान मोदी यांना प्रत्येक मतदारसंघात जाता यावे यासाठी मतदानाचे जाणीवपूर्वक पाच टप्पे केल्याचा आरोपही पवार यांनी केला.

४२-६ हे चित्र यावेळेला बदलेल..महाराष्ट्रात गेल्या निवडणूकीत ४२-६ असे चित्र होते. ते यावेळेला बदलेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या निवडणूकीत मला दोन गोष्टी प्रकर्षाने दिसत आहेत. एक म्हणजे शेतकरी या सरकारच्या धोरणाबध्दल नाराज आहे आणि गेल्या निवडणूकीत मोदी मोदी करणाऱ्या तरुण पिढीचा उत्साह कमी झाला आहे.

कांद्याची निर्यातबंदी चुकीचीचकांदा उत्पादक शेतकरी हा जिरायती भागातील आहे. त्यांच्या उत्पादनाला चांगले पैसे मिळावेत यासाठी आमच्या काळात कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कांद्याच्या माळा घालून भाजपच्या लोकांनी त्याला विरोध केला. मात्र, ही परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली. सध्याच्या सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे पवार यांनी सांगितले.

फडणवीस यांनाही माहीत नाही अशा जोडण्याकोल्हापुरात तुम्हाला कोण कोण येऊन भेटून गेले याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी तसे अनेकजण भेटत असतात. काहीजण गुपचुप भेटतात. देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत होणार नाहीत अशा जोडण्या लावत असतो असे सांगत फिरकी घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीreservationआरक्षण