शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाघाला फुटीने घेरले, जनाधार टिकवण्याचे आव्हान

By समीर देशपांडे | Updated: October 26, 2024 16:13 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ...

समीर देशपांडेकोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो’ असे म्हणून ठाकरे तरुणाईला भावेल अशा भाषेत विरोधकांचा पंचनामा करायचे. त्यावर फिदा होणाऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची संख्या वाढायला लागली. काँग्रेसअंतर्गत असणारे गट-तट, मतदारसंघातील तत्कालीन परिस्थिती अशा स्थितीत गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला आणि खालीही ठेवला. पण, शिवसेनेचा जिल्ह्यातील आवाज चढत राहिला. २०१४ साली इतक्या टिपेला गेला की १० पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. परंतु, २०१९ ला हाच आवाज क्षीण झाला. फुटीनंतर आता सेनेपुढे जनाधार टिकविण्यासाठी काम करावे लागेल. काँग्रेस नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून पारंपरिक मतदारसंघाला मगरमिठी घातल्यानंतर ती सोडविणे अजिबातच सोपे नव्हते. परंतु, याला छेद देत पहिल्यांदा १९९० मध्ये शाहूवाडीतून बाबासाहेब पाटील-सरुडकर आणि कोल्हापूर शहरातून दिलीप देसाई यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला.१९९५ ला शाहूवाडीतून संजय गायकवाड आणि कोल्हापूर शहरातून सुरेश साळाखे विजयी झाले. याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत संजय घाटगे शिवसेनेतून बाजी मारली. परंतु, १९९९ ला एकमेव सुरेश साळोखे विजयी झाले. २००४ साली शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला, तर इकडे शहरात मात्र राजघराण्याचे वलय आणि नवा चेहरा यामुळे मालोजीराजेंनी बाजी मारली. २००९ मध्ये मिणचेकर, क्षीरसागर जायंट किलर

  • २००९ मध्ये शिवसेनेने दहापैकी सहा जागा लढविल्या आणि त्यातील तीन जिंकल्याही. करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी बाजी मारली, तर विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली. 
  • शिवसेनेचा सुरुवातीचा प्रवास मिळेल त्यांना सोबत घेऊन झाला. शिवसेना फुटल्यानंतर आता शिंदेसेनेसमोर हा जनाधार टिकविण्याचे आव्हान आहे.

पाच वर्षांचा सुवर्णकाळ

  • २०१४ हे शिवसेनेसाठी सुवर्णकाळ ठरले. जिल्ह्यातील १० पैकी तब्बल ६ शिवसेना उमेदवार विजयी झाले आणि दोन्ही काँग्रेस पिछाडीवर गेल्या. या सहापैकी चौघेजण हे पारंपरिक राजकीय घराण्यातील नव्हते. परंतु, यातील नरके यांनी शेकापचा प्रभाव ओसरल्यानंतर ती जागा घेत आपले बस्तान बसविले. 
  • आबिटकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडून एक निवडणूक अपक्ष लढविली. नवा चेहरा, गतिमान संपर्क आणि समूहाची कामे करण्यावर भर देत त्यांनी बस्तान बसविले. 
  • कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन क्षीरसागर दोन वेळा आमदार झाले, तर सरुडकरांनी गरज असेल तेव्हा भगवा खांद्यावर घेतला. 
  • उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी सोडून घात साधली, तर डॉ. सुजित मिणचेकर यांनी पहिली संधी घेत नंतर दुसऱ्यांदा बाजी मारली.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv Senaशिवसेना