शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाघाला फुटीने घेरले, जनाधार टिकवण्याचे आव्हान

By समीर देशपांडे | Updated: October 26, 2024 16:13 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ...

समीर देशपांडेकोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो’ असे म्हणून ठाकरे तरुणाईला भावेल अशा भाषेत विरोधकांचा पंचनामा करायचे. त्यावर फिदा होणाऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची संख्या वाढायला लागली. काँग्रेसअंतर्गत असणारे गट-तट, मतदारसंघातील तत्कालीन परिस्थिती अशा स्थितीत गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला आणि खालीही ठेवला. पण, शिवसेनेचा जिल्ह्यातील आवाज चढत राहिला. २०१४ साली इतक्या टिपेला गेला की १० पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. परंतु, २०१९ ला हाच आवाज क्षीण झाला. फुटीनंतर आता सेनेपुढे जनाधार टिकविण्यासाठी काम करावे लागेल. काँग्रेस नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून पारंपरिक मतदारसंघाला मगरमिठी घातल्यानंतर ती सोडविणे अजिबातच सोपे नव्हते. परंतु, याला छेद देत पहिल्यांदा १९९० मध्ये शाहूवाडीतून बाबासाहेब पाटील-सरुडकर आणि कोल्हापूर शहरातून दिलीप देसाई यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला.१९९५ ला शाहूवाडीतून संजय गायकवाड आणि कोल्हापूर शहरातून सुरेश साळाखे विजयी झाले. याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत संजय घाटगे शिवसेनेतून बाजी मारली. परंतु, १९९९ ला एकमेव सुरेश साळोखे विजयी झाले. २००४ साली शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला, तर इकडे शहरात मात्र राजघराण्याचे वलय आणि नवा चेहरा यामुळे मालोजीराजेंनी बाजी मारली. २००९ मध्ये मिणचेकर, क्षीरसागर जायंट किलर

  • २००९ मध्ये शिवसेनेने दहापैकी सहा जागा लढविल्या आणि त्यातील तीन जिंकल्याही. करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी बाजी मारली, तर विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली. 
  • शिवसेनेचा सुरुवातीचा प्रवास मिळेल त्यांना सोबत घेऊन झाला. शिवसेना फुटल्यानंतर आता शिंदेसेनेसमोर हा जनाधार टिकविण्याचे आव्हान आहे.

पाच वर्षांचा सुवर्णकाळ

  • २०१४ हे शिवसेनेसाठी सुवर्णकाळ ठरले. जिल्ह्यातील १० पैकी तब्बल ६ शिवसेना उमेदवार विजयी झाले आणि दोन्ही काँग्रेस पिछाडीवर गेल्या. या सहापैकी चौघेजण हे पारंपरिक राजकीय घराण्यातील नव्हते. परंतु, यातील नरके यांनी शेकापचा प्रभाव ओसरल्यानंतर ती जागा घेत आपले बस्तान बसविले. 
  • आबिटकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडून एक निवडणूक अपक्ष लढविली. नवा चेहरा, गतिमान संपर्क आणि समूहाची कामे करण्यावर भर देत त्यांनी बस्तान बसविले. 
  • कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन क्षीरसागर दोन वेळा आमदार झाले, तर सरुडकरांनी गरज असेल तेव्हा भगवा खांद्यावर घेतला. 
  • उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी सोडून घात साधली, तर डॉ. सुजित मिणचेकर यांनी पहिली संधी घेत नंतर दुसऱ्यांदा बाजी मारली.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv Senaशिवसेना