शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'गडहिंग्लज कारखान्याच्या संभाव्य तोट्याला ब्रिस्क कंपनीच जबाबदार, मंत्री मुश्रीफांनी काय मदत केली'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:58 IST

विरोधकांना कारखान्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी

गडहिंग्लज :बँकांची देणी व शासकीय कर्जासाठी वाढवून दिलेल्या २ वर्षांसह ४ वर्षे आधी कारखाना सोडल्यामुळे ४ वर्षातील कारखान्याच्या संभाव्य तोटयाला 'ब्रिस्क कंपनी'च जबाबदार आहे, असा आरोप आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.चालू हंगामातील तथाकथित १२ कोटींच्या तोट्यासह कारखान्याच्या वजन काट्याबाबत व मनमानी कारभाराबाबत विरोधी संचालकांकडून दिशाभूल सुरू आहे.परंतु,दोन- अडीच कोटींपेक्षा अधिक तोटा होणार नाही, असे स्पष्ट करतांनाच विरोधकांना कारखान्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.शिंदे म्हणाले,२०१३ मध्ये ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना 'ब्रिस्क'ला चालवायला दिला होता.परंतु, कंपनीकडून ३९ कोटी ७७ लाख मिळाले असून अद्याप ३ कोटी २६ लाख येणे आहेत.संचालक मंडळ आणि कंपनीत कोणताही वाद नसतानाही शासनाने एकतर्फी  कारखाना संचालकांच्या ताब्यात दिला.संचालक मंडळाच्या सर्वाधिकारानुसारच उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे व आपण कारखाना स्वबळावर सुरू केला आहे.परंतु, त्यात आजही अडथळे आणले जात आहेत. त्यांचा शोध व समाचार  सूज्ञ गडहिंग्लजकर नक्कीच घेतील.यावेळी संचालक अमर चव्हाण, संभाजी नाईक व बाळकृष्ण परीट, शशिकांत चोथे उपस्थित होते.

शिंदे म्हणतात..- मंत्री मुश्रीफ यांना मदतीसाठी भेटूनही ते नाकारतात. कारखाना वेळेवर सुरू होण्यासाठी त्यांनी काय मदत केली ?- 'ब्रिस्क'कडून कामगारांचे १४ कोटी व तोडणी वाहतूक कमिशन २५ टक्के येणे आहे.- सप्टेंबर २०१९ अखेरचा कामगार पगार कंपनी देईल, असे आश्वासन मुश्रीफांनी दिले आहे ते पाळणार का?- कारखान्याने कंपनीला २४ कोटी ६५ लाख देण्याचा सहकार सचिवांचा आदेश बेकादेशीर असून त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याचेच दुःख कंपनीला पाठिंबा देणाऱ्या संचालकांना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेHasan Mushrifहसन मुश्रीफ