शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दुधाच्या वजनकाट्यातील लूट थांबणार, दूध उत्पादकांचा फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 14:36 IST

सध्या ही अचूकता १०० मिलीलिटरपर्यंतची असल्याने एक ते ९९ मिलीलिटर दूध जास्त घेतले तरी त्याची नोंद होत नव्हती.

कोल्हापूर : सहकारी व खासगी दूध संस्था शेतकऱ्यांकडून दूध घेताना वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्राॅनिक वजनकाट्याची अचूकता आता १० मिलीलिटरपर्यंत कमी करण्यात आली आहे तसे आदेश राज्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी बुधवारी दिले. याची अंमलबजावणी नव्या वर्षात एक जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडने यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा केला होता. सध्या ही अचूकता १०० मिलीलिटरपर्यंतची असल्याने एक ते ९९ मिलीलिटर दूध जास्त घेतले तरी त्याची नोंद होत नव्हती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. एका शेतकऱ्याचे सरासरी ५० मिलीलिटर दूध महिनाभर वाचले तरी दीड लिटर दूध वाढू शकते. त्याचे त्याला किमान ७५ रुपये जास्त मिळू शकतील. कोल्हापूर जिल्ह्यात एकट्या गोकुळ दूध संघाचेच पाच लाखांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेड पाच-सहा वर्षांपासून आंदोलन करत आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांच्या माध्यमातून दूध उत्पादकांची होत असलेली लूट थांबविणे यासाठी ब्रिगेडने २०१७ आंदोलन केले. दुधाच्या काट्याची अचूकता १०० मिलीच्या पटीत असल्यामुळे १०० मिलीपेक्षा कमी असणारे दूध हे बिनमापी दूध संस्थांच्या खात्यामध्ये जाते. ही लूट थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याकरिता वैधमापन शास्त्र विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

कोल्हापुरातील वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक गायकवाड यांनी दूध उत्पादकांची १०० मिलीलीटरच्या निकषाने लूट होत असल्याचे कबूल केले. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी पाठपुरावा केला. शासनाने समिती स्थापन करून त्याची चौकशी केली. या समितीच्या अहवालानुसार १०० मिलीलिटरच्या पटीमध्ये दूध उत्पादक ग्राहकांची इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर फसवणूक होत असल्याची बाब समोर आल्याने वैधमापन शास्त्र विभागाकडून दुधाचे वजन-काटे सरसकट दहा मिली अचूकतेचे करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची अंमलबजावणी नवीन वर्षात करण्यात येणार आहे पुढील दोन महिन्यात सर्व दूध संस्थांनी आपल्या वजनकाट्यांमध्ये योग्य ते बदल करून अचूकता दहा मिली करावी, असे न केल्यास त्यांच्यावर वैधमापन शास्त्र विभागाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशामध्ये म्हटले आहे.

फॅट तपासणीसाठी ५ मिलीच दूध..

संभाजी ब्रिगेडने यापूर्वी दुधाचे फॅट तपासण्यासाठी किती दूध घ्यावे या विषयावर यशस्वी आंदोलन केले. कोल्हापूरसह महाराष्ट्रात ५० ते १०० मिली दूध फॅट तपासणीसाठी घेतले जात होते. त्याचे प्रमाण निश्चित करण्याचे काम दुग्धविकास विभागाने केले. त्यानुसार फॅट तपासण्यासाठी फक्त पाच मिलीइतकेच दूध लागत असून अतिरिक्त दूध उत्पादकांना परत देण्याचे आदेश काढण्यात आले.

वजनकाट्यांची अचूकता दहा मिली झाल्याने लाखो दूध उत्पादकांचा फायदा होणार आहे. यंदाच्या दिवाळीला संभाजी ब्रिगेडकडून सर्व दूध उत्पादकांना ही दिवाळी भेट आहे. - रुपेश पाटील, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधFarmerशेतकरी