शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
5
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
6
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
7
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
8
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
9
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
10
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
11
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
12
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
13
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
14
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
15
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
17
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
18
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
19
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
20
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल

अपयश लपविण्यासाठीच सरकारी यंत्रणांची दहशत, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:50 IST

भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्राच्या खाईत ढकलत आहे

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, आपले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, राजकीय नेत्यांना खोट्या खटल्यात अडकविण्याचा उद्योग सुरू आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील वारे वसाहत व सिद्धार्थनगर येथील प्रचारसभेत बोलताना केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सभेत चव्हाण यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्र्याच्या खाईत ढकलत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी यांना सरकार चालवायला जमत नाही. सरकारी विमान कंपन्या, विमानतळ, रेल्वे, सरकारी जमिनी विकायचे काम सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना नेहमी फसवू शकत नाही. जनता आता शहाणी झाली आहे. भाजपची सत्ता उधळून लावण्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

वैचारिक राजकारण करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर जाऊन विरोधक टीका करू लागल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या आणि देशात खासगीकरणाद्वारे फक्त अंबानी, अदानी यांना मोठे करणाऱ्या भाजपला मते मागण्याचा हक्क राहिलेला नाही, कोल्हापूरची ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, भाजपने ती करून दिली नाही. परंतु छत्रपती ताराराणीची ही भूमी आहे. त्यामुळे जयश्री जाधव यांना आमदार करून ताराराणीचा वारसा जपला जाईल, असे त्या म्हणाल्या.

गोरगरिबांच्या संकटकाळी धाऊन जाणाऱ्या चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्याकरिता जयश्री जाधव तुमच्या समोर आल्या आहेत, त्यांच्या विजयात सिद्धार्थनगरचा वाटा मोठा असेल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार जयंत आसगावकर, जयश्री जाधव, वसंत लिंगनूरकर यांची भाषणे झाली. निशिकांत सरनाईक, सुशील कोल्हटकर, जय पटकारे, लता कदम, शारंगधर देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा