शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सातारा-कागल रस्त्याची निविदा आता २३ डिसेंबरला उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 15:12 IST

सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी आतापर्यंत २२ वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे; पण दरवेळी अडचणी येत असल्यामुळे त्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत.

कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणीमुळे स्थगित करण्यात आलेली सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा येत्या २३ डिसेंबरला खुली होणार आहे. यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार असल्याने नव्या वर्षात तरी सात वर्षांपासून सुरू असलेला निविदांचा फेरा एकदाचा संपून सहापदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल याकडे लक्ष लागले आहे.

सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी आतापर्यंत २२ वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे; पण दरवेळी अडचणी येत असल्यामुळे त्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील वादामुळे तर नुसतीच चालढकल सुरू होती. अखेर केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच पुढाकार घेऊन महामार्ग प्राधिकरणकडून हे काम होईल आणि यासाठी ३७२० कोटी रुपयांची दोन टप्प्यांतील निविदा ऑक्टोबरमध्ये काढली होती. नवी दिल्लीतूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याने यात राज्य रस्ते विकास महामंडळाचा कोणताही हस्तक्षेप राहिलेला नाही.

सध्याच्या चारपदरी रस्त्याची मालकी व देखभाल राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. २०२२ मध्ये त्याची मुदत संपत आहे. ही मुदत संपत असल्याने या रस्त्याचे आता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण झाले असून त्यांनी नवा मार्ग करण्यासाठी रस्ता बांधणीचा आराखडाही तयार करून ठेवला आहे. सातारा ते कागल या महामार्गावर महापुराचे पाणी येऊन हा रस्ता बंद पडण्याच्या घटना २००५ नंतर तीन वेळा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही समस्या कायमची मिटविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना केल्या आहेत. त्याची दखल घेत १३ ठिकाणी बाॅक्स व १७ ठिकाणी ओपनिंग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आहे त्या पुलांची उंची वाढवणे, फ्लायओव्हर करणे, आदीच्या आराखड्याचे सादरीकरणही झाले आहे.

भूसंपादन झाले पूर्ण

मात्र, हे सर्व झाले तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार याबाबत कोणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. ९८ टक्के भूसंपादनही झाले आहे. आता प्रतीक्षा आहे ती फक्त निविदा उघडण्याची आणि हे काम करणाऱ्या कंपनीची निवड होण्याची. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची अट घातली असली तरी निविदांच्या फेऱ्यातून बाहेर कधी पडणार आणि प्रत्यक्ष कामास कधी सुरुवात होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गSatara areaसातारा परिसरkagal-acकागल