शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदारांसह दहाही आमदार भाजपचेच : चंद्रकांतदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 11:51 IST

लोकसभेला सरकार बनवलं, विधानसभा जिंकली. काँग्रेसवाले म्हणाले आता नगरपालिकेला सोडत नाही तर राज्यातील ७० टक्के नगरपरिषदा जिंकल्या, मग जिल्हा परिषदा जिंकल्या, आता ग्रामपंचायतींही ताब्यात घेतल्या. आता २०१९ मध्ये दोन खासदार आणि आठ आमदार भाजपचे आणि दोन आमदार आम्ही ठरवू तेच जिंकणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच-सदस्यांचा सत्कारचंद्रकांतदादा पाटील यांनी दिले विरोधकांना आव्हान जे उपक्रम राबवाल त्यासाठी सरकार आणि गरज लागेल तिथे चंद्रकांत पाटील मदत करेल

कोल्हापूर : लोकसभेला सरकार बनवलं, विधानसभा जिंकली. काँग्रेसवाले म्हणाले आता नगरपालिकेला सोडत नाही तर राज्यातील ७० टक्के नगरपरिषदा जिंकल्या, मग जिल्हा परिषदा जिंकल्या, आता ग्रामपंचायतींही ताब्यात घेतल्या. आता म्हणतील २०१९ मध्ये बघूया. चला, आम्ही तयार आहोत. दोन खासदार आणि आठ आमदार भाजपचे आणि दोन आमदार आम्ही ठरवू तेच जिंकणार हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.

भाजपच्यावतीने नूतन सरपंच आणि सदस्यांचा सत्कार महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नेते, कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत भाजपने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील हे यश सर्वांना स्नेहभोजन देऊन साजरे केले. यावेळी १२८ सरपंच आणि ११०० सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिवसेनेने गेल्याच आठवड्यात ‘सहा’चे, ‘दहा’ आमदार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. शिवसेनेचे नाव न घेता पाटील यांनी हा टोला लगावला.पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसची जहाँगिरी मानली जायची. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात १२८ सरपंच भाजपचे झाले. सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला तेथे भाजपचे ७२ सरपंच झाले, सांगलीत तर तीन-तीन मंत्री असायचे, तिथेही १०० सरपंच भाजपचे झाले.

तुम्ही राहता त्या गावातील गरिबी कधीपर्यंत संपेल, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांना मला विचारला होता. तोच प्रश्न घेऊन माझ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर गावातील आणि कोल्हापूर शहरातील गरिबी दूर करण्यासाठी मी रात्रं-दिवस काम करतो.

ईश्वराची प्रार्थना करतानाही मी याचे स्मरण करतो. तुम्हीही आजपासून आपले गाव गरिबीमुक्त करण्याचा संकल्प करा. जखमी कुत्र्यांपासून ते आजारी असलेल्या माणसांपर्यंत सर्वांसाठी माझे काम सुरू असते असे पाटील यांनी सांगितले.आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, सन १९६० पासून कोल्हापूरला जी मंत्रिपदे मिळाली त्याचा आढावा घेतला तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो की त्यांनी चंद्रकांतदादांच्या रूपाने कोल्हापूरला पहिल्यांदा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम, सहकार ही महत्त्वाची खाती दिली.

संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदार तर समरजितसिंह घाटगे यांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष केले. फडणवीस यांनी कोल्हापूरचा सन्मान केला. दुसरीकडे ४० वर्षे थांबलेला विकास आराखडा दादांनी मंजूर करून घेतला. १ हजार कोटींपेक्षा अधिक निधी आणला.

‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, पदाधिकाºयांनी सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये मिसळून काम करण्याची गरज आहे. तुमच्या सहकार्यासाठी आमची कार्यालये खुली राहतील. भाजपचे राज्य चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके,राहुल देसाई यांचीही भाषण झाले. संघटनमंत्री बाबा देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी, गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, दौलत कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेता अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, अनिल यादव, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन विलास नाईक, अण्णा भाऊ सूतगिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शौमिका महाडिकांनी मांडला पक्षातंर्गत मतभेदाचा मुद्दाजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पक्षांतर्गत मतभेदाचा मुद्दा मांडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद सुरू झाले आणि पार्टी संपली. आपल्यातही असं काही होतं का हे पाहायला हवे. पक्षाचेच पदाधिकारी विरोधकांच्या स्टेजवर जावून भाषणे कशी करतात, अशी विचारणा महाडिक यांनी केली. शिरोली येथे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्याने महाडिकांविरोधात भूमिका घेतली होती; याचा याला संदर्भ होता.

अंधार संपवण्यासाठी दिव्याची भेटमंत्री पाटील म्हणाले, आज तुम्हा सर्वांना एक दिवा भेट म्हणून देण्यात आला आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी हा दिवा भेट म्हणून दिला आहे. याची नेहमी जाणीव ठेवून काम करा.

केलेली मदत लोकांच्या घरी जाऊ देतुम्हाला दहा लाखांचा निधी दिला पाहिजे तो तुमचा अधिकारच आहे. मात्र, यासाठी जे काही उपक्रम तुम्ही राबवाल त्यासाठी सरकार आणि गरज लागेल तिथे चंद्रकांत पाटील मदत करेल. मात्र, ती मदत लोकांच्या घरी जावू दे. तुमच्या घरात जाता कामा नये. खिशाला चाट लावून लोकांचे काम करण्याची वृत्ती ठेवा, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :BJPभाजपाChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील