शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:59 IST

या प्रकल्पांना मिळणार सवलती

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांसाठी तेलगंणाने पायघड्या अंथरल्या आहेत. नवीन प्रकल्प सुरू करणाऱ्यांवर भांडवली अनुदान, व्याज अनुदान, कर परतावा, यासह विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या धरसोडीच्या आणि उदासीनतेच्या धोरणाला वैतागलेले अनेक उद्योजक तेलंगणात आपल्या उद्योगाचे स्थलांतर करण्याच्या किंवा तेथे नवा प्रकल्प सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनीही तेलंगणात आपला उद्योग सुरू करावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तेलंगणात केंद्र सरकारचा एक आणि राज्य सरकारचे नऊ, असे दहा टेक्स्टाइल पार्क उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांची गेल्याच आठवड्यात हैदराबाद येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत राव यांनी राज्य सरकारने देऊ केलेल्या सवलतींची माहिती दिली, तसेच वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी राज्य सरकार उद्योजकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक उद्योजकांनी तेलंगणात उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...या आहेत सवलती

  • कापड तयार करणाऱ्या पारंपरिक प्रकल्पाला एक कोटी रुपयांपर्यंत २५ टक्के भांडवली अनुदान. हीच मर्यादा तांत्रिक प्रकल्पासाठी (टेक्निकल टेक्स्टाइल) दोन कोटी रुपयांपर्यंत किंवा ३५ टक्के भांडवली अनुदान
  • प्रकल्पासाठीच्या कर्जावर २५ टक्के व्याज अनुदान.
  • व्हॅट, सीएसटी, एसजीएसटीचा परतावा सात वर्षांपर्यंत किंवा स्थिर भांडवली गुंतवणुकीएवढे उत्पन्न परत मिळेपर्यंत दिला जाणार.
  • प्रतियुनिट एक रुपया वीजदर सवलत.
  • स्टॅम्प ड्यूटी, ट्रान्स्फर ड्युटीही परत मिळणार.
  • कार्यालय किंवा प्रकल्पासठी भूखंड खरेदीत प्रतिएकर २० लाख रुपयांपर्यंत सवलत.
  • पर्यावरण रक्षण, ऊर्जा आणी पाणी या सुविधांसाठी ५० लाख रुपयांपर्यंत किंवा त्या उभारण्याकरिता लागणाऱ्या खर्चाच्या ४० टक्के मदत.

या प्रकल्पांना मिळणार सवलतीआधुनिक स्पिनिंग विव्हिंग मिल्स, डाॅइंग अँड प्रोसेसिंग, निटिंग, गारमेंट, कारपेटिंग, मशीन एम्ब्राॅयडरी, टेक्निकल टेक्स्टाइल्ससह वस्त्रोद्योगाच्या मूल्यवर्धित साखळीत समावेश असलेले कारखाने.                      

तेलंगणा सरकारने वस्त्रोद्योग उभारणीसाठी मोठ्या सवलती दिल्यामुळे उद्योजक तिकडे जाणार असतील तर ते गंभीर आहे. महाराष्ट्र सरकारने या उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सोडविल्या पाहिजेत. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाbusinessव्यवसाय