शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी शिक्षकांनी केले नाट्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:57 IST

गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता. शिक्षक-विद्यार्थी नात्यावर प्रकाश टाकणारी ही आठवण आज (सोमवारी) शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनी उजेडात आली आहे.निधी उभारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगांबाबत शिक्षकांनी सुुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेले निवेदन, उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगांवकर यांनाही पाठविले होते. तेथील कागदपत्रांमध्ये हे निवेदन नुकतेच सापडले आहे. त्यातून या कादंबरीच्या प्रकाशनाचा रोचक इतिहास उजेडात आला आहे.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेट, यातून सावंत यांनी या कादंबरीचे लेखन केले. मात्र, प्रकाशनासाठी मोठा खर्च येणार असल्याने ते चिंतेत होते. ही बातमी व्यंकटराव हायस्कूलमधील त्यांच्या शिक्षकांना समजली. आपल्या माजी विद्यार्थ्याची साहित्यकृती प्रकाशित व्हावी, यासाठी शिक्षकांनी कंबर कसली. मात्र, तुटपुंज्या पगारात ते शक्य नव्हते. त्यामुळे निधी उभारण्यासाठी सर्वांनी मिळून एक नाटक सादर करायचे ठरविले.त्यानुसार, बाळ कोल्हटकरलिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक बसविण्यात आले. त्यातून जमा झालेला निधी सावंत यांना देण्यात आला. त्यानंतर, १९६७च्या गणेश चतुर्थीला ‘मृत्युंजय’चे पूजन आणि प्रकाशन झाले. केवळ तीन महिन्यांत तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपली आणि आजतागायत ‘मृत्युंजय’वरचे वाचकांचे प्रेम कमी झालेले नाही.>शिक्षकांनीच साकारल्या भूमिकाया नाटकामध्ये मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री बा. मा. कुलकर्णी, आप्पासाहेब निर्मळे, वसंतराव गायकवाड, नारायण डोणकर, शिवाजी पाटील, सिनेतारका अलका इनामदार-कुबल, सरोजिनी सुखटणकर यांनी भूमिका केल्या. दिनकर पोवार यांनी या नाटकाला संगीत दिले होते.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेटीतून सावंत यांचे लेखन.