शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी शिक्षकांनी केले नाट्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:57 IST

गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता. शिक्षक-विद्यार्थी नात्यावर प्रकाश टाकणारी ही आठवण आज (सोमवारी) शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनी उजेडात आली आहे.निधी उभारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगांबाबत शिक्षकांनी सुुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेले निवेदन, उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगांवकर यांनाही पाठविले होते. तेथील कागदपत्रांमध्ये हे निवेदन नुकतेच सापडले आहे. त्यातून या कादंबरीच्या प्रकाशनाचा रोचक इतिहास उजेडात आला आहे.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेट, यातून सावंत यांनी या कादंबरीचे लेखन केले. मात्र, प्रकाशनासाठी मोठा खर्च येणार असल्याने ते चिंतेत होते. ही बातमी व्यंकटराव हायस्कूलमधील त्यांच्या शिक्षकांना समजली. आपल्या माजी विद्यार्थ्याची साहित्यकृती प्रकाशित व्हावी, यासाठी शिक्षकांनी कंबर कसली. मात्र, तुटपुंज्या पगारात ते शक्य नव्हते. त्यामुळे निधी उभारण्यासाठी सर्वांनी मिळून एक नाटक सादर करायचे ठरविले.त्यानुसार, बाळ कोल्हटकरलिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक बसविण्यात आले. त्यातून जमा झालेला निधी सावंत यांना देण्यात आला. त्यानंतर, १९६७च्या गणेश चतुर्थीला ‘मृत्युंजय’चे पूजन आणि प्रकाशन झाले. केवळ तीन महिन्यांत तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपली आणि आजतागायत ‘मृत्युंजय’वरचे वाचकांचे प्रेम कमी झालेले नाही.>शिक्षकांनीच साकारल्या भूमिकाया नाटकामध्ये मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री बा. मा. कुलकर्णी, आप्पासाहेब निर्मळे, वसंतराव गायकवाड, नारायण डोणकर, शिवाजी पाटील, सिनेतारका अलका इनामदार-कुबल, सरोजिनी सुखटणकर यांनी भूमिका केल्या. दिनकर पोवार यांनी या नाटकाला संगीत दिले होते.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेटीतून सावंत यांचे लेखन.