शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी शिक्षकांनी केले नाट्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:57 IST

गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता. शिक्षक-विद्यार्थी नात्यावर प्रकाश टाकणारी ही आठवण आज (सोमवारी) शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनी उजेडात आली आहे.निधी उभारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगांबाबत शिक्षकांनी सुुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेले निवेदन, उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगांवकर यांनाही पाठविले होते. तेथील कागदपत्रांमध्ये हे निवेदन नुकतेच सापडले आहे. त्यातून या कादंबरीच्या प्रकाशनाचा रोचक इतिहास उजेडात आला आहे.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेट, यातून सावंत यांनी या कादंबरीचे लेखन केले. मात्र, प्रकाशनासाठी मोठा खर्च येणार असल्याने ते चिंतेत होते. ही बातमी व्यंकटराव हायस्कूलमधील त्यांच्या शिक्षकांना समजली. आपल्या माजी विद्यार्थ्याची साहित्यकृती प्रकाशित व्हावी, यासाठी शिक्षकांनी कंबर कसली. मात्र, तुटपुंज्या पगारात ते शक्य नव्हते. त्यामुळे निधी उभारण्यासाठी सर्वांनी मिळून एक नाटक सादर करायचे ठरविले.त्यानुसार, बाळ कोल्हटकरलिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक बसविण्यात आले. त्यातून जमा झालेला निधी सावंत यांना देण्यात आला. त्यानंतर, १९६७च्या गणेश चतुर्थीला ‘मृत्युंजय’चे पूजन आणि प्रकाशन झाले. केवळ तीन महिन्यांत तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपली आणि आजतागायत ‘मृत्युंजय’वरचे वाचकांचे प्रेम कमी झालेले नाही.>शिक्षकांनीच साकारल्या भूमिकाया नाटकामध्ये मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री बा. मा. कुलकर्णी, आप्पासाहेब निर्मळे, वसंतराव गायकवाड, नारायण डोणकर, शिवाजी पाटील, सिनेतारका अलका इनामदार-कुबल, सरोजिनी सुखटणकर यांनी भूमिका केल्या. दिनकर पोवार यांनी या नाटकाला संगीत दिले होते.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेटीतून सावंत यांचे लेखन.