शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:46+5:302021-04-22T04:23:46+5:30
कोल्हापूर गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ...

शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार रखडले
कोल्हापूर गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होत आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवरदेखील पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्तविभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्तविभागाने बिले नाकारली असल्याचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले आहे. कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी पत्रकातून ही माहिती दिली.
मागील महिन्यातही असाच प्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. शिक्षण विभागाने वित्तविभागाकडे वेळेत पैसे न मागितल्यामुळे पगार उशिरा झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी वित्तसचिवांना भेटून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर हालचाली होऊन फेब्रुवारीचे पगार झाले. तरीसुद्धा अद्यापही काही जिल्ह्यांत फेब्रुवारीचे पगार झालेले नाहीत, असेही पत्रकात म्हटले आहे.