शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Lok Sabha Election 2019 जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:05 AM

शिरोळ : देशात जातीच्या नावावर राजकारण सुरू असून, या देशाला पंतप्रधानाची गरज होती. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे चौकीदार निघाले. ...

शिरोळ : देशात जातीच्या नावावर राजकारण सुरू असून, या देशाला पंतप्रधानाची गरज होती. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे चौकीदार निघाले. या निवडणुकीला व्यवसाय बनवून ठेवला आहे. गेली पाच वर्षे जातीच्या नावावर समाजामध्ये फूट पाडली जात आहे. विकासाची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे, असे आवाहन सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी केले.महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील आझाद मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. प्रकाश राज पुढे म्हणाले, जे चाळीस वीरजवान देशासाठी शहीद झाले, त्याचे पार्थिव हे ग्रामीण भागाकडे जात होते. त्यामुळे देश चालविणारा व रक्षण करणारा हा ग्रामीण भागातील शेतकरीच आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.त्यामुळे शेतकºयांचा आवाज लोकसभेत उठविण्यासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकसभेत पाठवा. मी देखील लोकसभेत असणार आहे, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या कारभारामुळे हा देश पिछाडीवर गेला असून कृषी, औद्योगिक, अंतर्गत सुरक्षा याचबरोबर आर्थिक संकटात सापडला आहे. सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतूनच काम केल्यामुळे आजही लोक वर्गणीबरोबर मतेही देत आहेत. दिल्लीहून आदेश निघाला आहे. काहीही करा, पण हातकणंगले मतदारसंघ सोडू नका. मात्र, ही शेतकरी चळवळ आहे. सत्तेचा व पैशांचा गैरवापर करणाºयांना जनताच जागा दाखविणार आहे.---————————————————चौकट - माझीही जबाबदारी : राजमाझी आई नर्स होती. तिने मला घडविलं. या फिल्म इंडस्ट्रिजमध्ये आल्यानंतर माझ्याकडे १२० रुपये होते. आज माझ्याजवळ खूप पैसा आहे. लोकांच्या प्रेमामुळेच मी इतके यश मिळवू शकलो. ज्या लोकांमुळे मी व माझा परिवार आनंदी आहे, त्या लोकांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. ती माझी जबाबदारी आहे, असे सांगून सिनेअभिनेते राज यांनी सभेला येण्याचा उद्देश विषद केला.लोकसभेची ही निवडणूक खासदार राजू शेट्टी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. माझ्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खोट्या अफवा पसरविल्या जात असून, मी शेवटपर्यंत राजू शेट्टी यांच्यासोबतच राहणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोदींच्या नावावर मते मागितली जात आहेत. त्यामुळे उमेदवाराचे कोणतेच कर्तृत्व नाही, हे सिद्ध होत आहे. जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याची चौकशी लावण्याचे काम सुरू आहे. सत्ता व पैशांचा भाजप सरकारला माज आला असून, जनताच त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक