शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘राष्ट्रवादी’च्या विरोधात ताराराणी आघाडीचे बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:52 AM

इचलकरंजी : नगरपालिकेकडील सत्तारूढ आघाडीमध्ये असलेले मतभेद गुरुवारी पुन्हा उघड झाले. ताराराणी आघाडीने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात बंड करून गुरुवारच्या सभेवर बहिष्कार टाकला आणि सभेस गणपूर्ती झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.गुरुवारी होणाऱ्या नगरपालिकेतील सभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २५) सत्तारूढ आघाडीची बैठक ...

इचलकरंजी : नगरपालिकेकडील सत्तारूढ आघाडीमध्ये असलेले मतभेद गुरुवारी पुन्हा उघड झाले. ताराराणी आघाडीने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात बंड करून गुरुवारच्या सभेवर बहिष्कार टाकला आणि सभेस गणपूर्ती झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.गुरुवारी होणाऱ्या नगरपालिकेतील सभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २५) सत्तारूढ आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये बांधकामाच्या कामावरून मतभेद झाले होते. अखेर वाद होऊन बुधवारची बैठक संपली.बुधवारच्याच विषयावर गुरुवारी सकाळी सभेपूर्वी साडेअकरा वाजता ताराराणी आघाडीच्या नगरसेवक-नगरसेविकांची बैठक उपनगराध्यक्षा सरीता आवळे यांच्या दालनात सुरू झाली. आघाडीचे प्रमुख चाळके यांचा भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्षा स्वामी यांच्या दालनात भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, राष्टÑवादीचे अशोकराव जांभळे, नगरसेवक युवराज माळी, दिलीप मुथा, आदींची बैठक झाली. यावेळी चाळके यांना बोलावून घेतले. बैठकीत जांभळे व चाळके यांच्यात पुन्हा मतभेद झाले. आमदार सुरेशराव हाळवणकर यांचा सत्तारूढ आघाडीची समन्वयाची बैठक शुक्रवारी घेण्याचा दूरध्वनीवरून निरोप आला. सभागृहात गणपूर्ती नसल्याचा मुद्दा कॉँग्रेसचे नगरसेवक राहुल खंजिरे यांनी उपस्थित केला. त्यावेळी सभागृहात ६७ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे अखेर सभागृहात गणपूर्ती नसल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय नगराध्यक्षांना घ्यावा लागला.सभेस उपस्थित राहणेजबाबदारी : नगराध्यक्षाशहरातील विविध विकासकामे आणि नागरी सेवा-सुविधा मार्गी लावाव्यात, यासाठी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलविण्याची जबाबदारी नगराध्यक्षांची आहे. तशी सभेला उपस्थित राहण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली.नगरपालिकेत विरोधी असलेल्या आघाडीच्या प्रमुखांना काही धोरणात्मक कामासंदर्भात विश्वासात घेऊनच कामकाज चालविण्यात येते, असेही नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या. ‘ताराराणी’चे प्रमुख सागर चाळके यांचा गैरसमज झाला होता. त्यातून गुरुवारच्या घडामोडी घडल्या; पण आज, शुक्रवारी आमदार सुरेश हाळवणकर समन्वयाची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर आपोआपच सर्व काही सुरळीत चालेल, असा विश्वास अजित जाधव व तानाजी पोवार यांनी व्यक्त केला.आमदार, नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावासभा रद्द झाल्याने सत्तारूढ व विरोधी आघाडीत कलगीतुरा रंगला. कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी सभेसाठी गणपूर्ती करण्याची जबाबदारी नगराध्यक्षांची असताना त्यांच्या भाजपचेच नगरसेवक अनुपस्थित राहिल्याबद्दल नगराध्यक्षा स्वामी यांना दोष दिला. तसेच दीड वर्षापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी जाहीरनाम्यात दिलेले एकही काम मार्गी लागले नसल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर नगराध्यक्षांनी विश्वास गमावल्याने त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी केली.सर्व सभापतींना कामाची संधी : चाळकेबुधवार व गुरुवार असे दोन्ही दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद सागर चाळके यांनी आमच्यातील मतभेद हे घरातील (आघाडीअंतर्गत) असल्याचे सांगितले व ते म्हणाले, महिला व बालकल्याण, इस्टेट, शिक्षण, आरोग्य अशा विविध समित्यांच्या सभापतींना विधायक काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.विरोधकांना विकासाची पर्वा नाहीतानाजी पोवार व अजित जाधव म्हणाले, गुरुवारच्या सभेत शहराच्या विकासाचे विषय असतानाही कॉँग्रेस व शाहू आघाडीचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभा रद्द करावी लागली.